शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

मुंबईचा सायबर विभाग रामभरोसे; पूर्णवेळ उपायुक्तही नाही, गुन्हे तीन हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 7:32 AM

उकल मात्र ४७७ गुन्ह्यांची, ६७५ आरोपींना अटक

-मनीषा म्हात्रेमुंबई : मुंबईत गेल्या नऊ महिन्यांत सायबर गुन्हेगारी संबंधित ३ हजार १९१ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी अवघ्या ४७७ गुन्ह्यांची उकल करत ६७५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणांसमोर कायम असताना मुंबईत गेल्या सहा महिन्यांपासून सायबर विभागाला पूर्ण वेळ पोलिस उपायुक्तही लाभलेले नाहीत. सायबर विभागाचा अतिरिक्त पदभार अंमलबजावणी विभागाच्या उपायुक्तांना देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरपर्यंत ३ हजार १९१ सायबर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये शेकडो कोटींवर सायबर ठगांनी डल्ला मारला आहे. 

तपास भत्ता मिळेना

एखाद्याच्या गुन्ह्याचा तपासासाठी तपास भत्ता, तसेच अद्ययावत यंत्रणाचा अभाव असल्यामुळे तपासावर परिणाम होत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच बऱ्याच जणांना जबरदस्तीने या विभागात ढकलले जाते. त्यामुळे आवड नसल्याने त्याचा कामावरही परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सायबर पोलिस ठाण्यात प्रशिक्षित व्यक्तींनाच ठेवणे गरजेचे आहे. ज्यांना आवड आहे अशा व्यक्तींची निवड केल्यास अपुऱ्या मनुष्यबळावरही गुन्ह्याची उकल होण्यास मदत होईल असेही त्यांनी नमूद केले आहे.

क्रेडिट कार्ड, ऑनलाइन फ्रॉड संबंधित ८८७ गुन्हे, नोकऱ्यांविषयक फसवणुकीच्या ३१९ गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे. सायबर गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अपुरे मनुष्यबळ, तांत्रिक सुविधांच्या अभावामुळे महत्त्वाच्या अशा सायबर विभागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सायबर विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. बालसिंग राजपूत यांची मे महिन्यात सायबर विभागातून डिटेक्शनला बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. सध्या या विभागाचा अतिरिक्त कार्यभार अंमलबजावणी विभागाचे डॉ. डी. ए. स्वामी यांच्याकडे देण्यात आला. स्वामी यांच्याकडे सी. ए. डब्ल्यू. विभागाचाही अतिरिक्त भार आहे.  त्यामुळे सायबर विभागाला पूर्णवेळ उपयुक्त कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अन् पेनही आला नाही... 

सायबर गुन्ह्याच्या वाढत्या आव्हानामुळे मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र सायबर सेल सुरू करण्यात आले आहे. १० लाखांच्या व्यवहारांपर्यंतची प्रकरणे स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद होत आहेत. तर, १० लाखांवरील प्रकरणे सायबर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येत आहे. आजही ९० टक्के पोलिस ठाण्यात सायबर संबंधित आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. महिन्याला सायबर प्रशिक्षण होते. मात्र त्याचबरोबर आवश्यक टूल्स मिळणे गरजेचे आहे. आतापर्यंत तीन वेळा संदेश प्रसारणाद्वारे माहिती मागवण्यात आली. मात्र, साधा पेनही आला नसल्याचे सायबर सेलमध्ये काम करणाऱ्या पोलिसाने सांगितले. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMumbai policeमुंबई पोलीस