समीर वानखेडे यांना दणका, मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 06:05 PM2022-02-22T18:05:33+5:302022-02-22T18:06:39+5:30

Sameer Wankhede : याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच नवी मुंबईतील बारचा परवानाही रद्द केला होता.

Mumbai police sends summons to the Sameer Wankhede | समीर वानखेडे यांना दणका, मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

समीर वानखेडे यांना दणका, मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

googlenewsNext

बहुचर्चित IRS अधिकारी आणि NCB मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. २३ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. बारचा परवाना घेऊन बनावटगिरी आणि फसवणूक केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी यापूर्वीही त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच नवी मुंबईतील बारचा परवानाही रद्द केला होता.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देत प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. मात्र, आज हायकोर्टाने २६ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे ठाणे पोलिसांना निर्देश दिले आहेत. 


नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आरोप केले होते

वय लपवून बारचा परवाना घेतल्याप्रकरणी समीर वानखेडेविरोधात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेचा नवी मुंबईत बार असल्याचा आरोप केला होता. त्यासाठी समीर वानखेडे यांना अल्पवयीन असताना परवाना मिळाला. नवी मुंबईतील हॉटेल सद्गुरू येथे बारचा परवाना घेतला तेव्हा वानखेडे हे १७ वर्षांचे होते, असा दावा मलिक यांनी केला होता.

समीर वानखेडे यांना तूर्तास दिलासा, २८ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

1997 मध्ये परवाना देण्यात आला

27 ऑक्टोबर 1997 रोजी समीर वानखेडे यांना बार आणि रेस्टॉरंटसाठी परवाना देण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यावेळी समीर वानखेडे हे अवघे १७ वर्षांचे होते. तर बार परवाना मिळविण्यासाठी किमान वय २१ वर्षे आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला समीर वानखेडे यांच्या बार आणि रेस्टॉरंटचा मद्यविक्रीचा परवाना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला होता. वाशी, नवी मुंबई परिसरातील सद्गुरु फॅमिली बार आणि रेस्टॉरंट हे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाचे आहे. डीएमच्या आदेशानुसार सद्गुरु हॉटेल आणि बारचा परवाना रद्द करण्यात आल्याचे ठाण्याचे एसपी, एक्साईज निलेश सांगडे यांनी परवाना रद्द करताना सांगितले होते. यापूर्वी डीएमने समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.



वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते

यापूर्वी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. क्रूझ खटल्यातील एका स्वतंत्र साक्षीदाराने हे आरोप केले आहेत. किरण गोसावीचा अंगरक्षक असलेल्या प्रभाकर साईलने दावा केला होता की, शाहरुख खानच्या मुलाला सोडण्यासाठी 25 कोटींच्या डीलची चर्चा होत होती आणि शेवटी 18 कोटींमध्ये डील फायनल झाली, त्यापैकी 8 कोटी समीर वानखेडेला मिळणार होते. यानंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात एक एक असे खुलासे केले की समीर वानखेडे अडचणीत आले. आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीतूनही वानखेडे यांना बाजूला करण्यात आले होते. बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे समीरला एनसीबीमध्ये नोकरी मिळाल्याचे नवाब यांनी म्हटले होते. नवाब मलिक यांनी समीरने दोनदा लग्न केल्याचा मुद्दाही उपस्थित केला होता.

 

Web Title: Mumbai police sends summons to the Sameer Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.