शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

NCB: आरोपांच्या धडाक्यामुळे थंडावली एनसीबीची कारवाई; क्रूझ पार्टीचा तपासही रोडावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 8:50 AM

गेल्या ११ दिवसांपासून एकही कारवाई नाही. एनसीबीचे उपमहासंचालक  ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांची समिती गेले चार दिवस मुंबईत होती. समीर वानखेडे यांच्यासह कारवाईतील सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि साईल व गोसावी वगळता अन्य पंचाचे जबाब नोंदविले आहेत.

जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या १५ दिवसांपासून  एकापेक्षा एक गंभीर आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण कक्ष (एनसीबी) बॅकफूटवर आला आहे. गेल्या आठवड्यापासून एकही कारवाई केलेली नसून कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपासही रोडावला आहे. त्यामध्ये अभिनेत्री अन्यन्या पांडे हिच्याकडील चौकशी पूर्ण करण्यात आलेली नाही.

एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी  बनावट जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याबद्दल तसेच खंडणी, लाचखोरी आणि  बोगस कारवायांबद्दल झालेल्या आरोपांमुळे देशभरात एनसीबी सध्या वादाचा विषय बनली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीमध्ये कारवाई न करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  घेतला आहे. त्याबाबत मुंबई विभागाला सक्त सूचना देण्यात आल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

एनसीबीचे अधिकारी स्वत:च ड्रग्ज प्लांट करतात, पैसे उकळतात अशा स्वरूपाच्या २६ केसेसच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतर कारवाया थांबविण्याचे आदेश दिले आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी अभिनेत्री अनन्या पांडे हिची चौकशी झाली आहे. त्यानंतर तिला पुन्हा सोमवारी २५ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र रविवारी पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने शपथपत्राद्वारे वानखेडेवर आरोप केले. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अनन्याचे समन्स रद्द करण्यात आले. त्यानंतर तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही. तसेच पुढे नवा गुन्हाही दाखल झालेला नाही. जुन्या गुन्ह्यातील आरोपीही शोधले जात नाहीत. 

कारवाई करताना यापुढे दक्षता घ्या...nएनसीबीच्या  मुंबई पथकाने कार्डेलिया क्रूझवर केलेल्या कारवाईसह गेल्या वर्षभरात केलेल्या काही कारवायांबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. काही पंच साक्षीदार उघडपणे फितूर झाले आहेत. त्यामुळे यापुढे कारवाई करताना सर्व बाबींची योग्य दक्षता घेण्याच्या सूचना  महासंचालक एस. बी. प्रधान यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.nसर्व आरोपांनंतर एनसीबीची कारवाई ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस कारवाई न करण्याची सूचना दिल्लीतील अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रभाकर साईल, गोसावीच्या जबाबाविनाच एनसीबीची समिती दिल्लीला रवानाक्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानवरील कारवाई टाळण्यासाठी २५ कोटींच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपांच्या चौकशीसाठी मुंबईला आलेली उच्चस्तरीय चौकशी समिती शनिवारी दिल्लीला रवाना झाली. विशेष म्हणजे एनसीबीवर आरोप करणाऱ्या पंच प्रभाकर साईल व या प्रकरणातील वादग्रस्त साक्षीदार किरण गोसावी यांची चौकशी न करताच ते माघारी परतले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काढण्यात आलेल्या निष्कर्षाबद्दल सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

 एनसीबीचे उपमहासंचालक  ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांची समिती गेले चार दिवस मुंबईत होती. समीर वानखेडे यांच्यासह कारवाईतील सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि साईल व गोसावी वगळता अन्य पंचाचे जबाब नोंदविले आहेत. ही समिती आपला अहवाल एनसीबीचे महासंचालक एस. बी. प्रधान यांच्याकडे सुपुर्द करणार आहे. 

समितीने मुंबईत आल्यानंतर बुधवारी समीर वानखेडे यांच्याकडे सुमारे साडेचार तास चौकशी करून सविस्तर जबाब नोंदविला. मात्र फरारी असलेल्या गोसावीला पुणे पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतल्याने त्याचा जबाब समितीला घेता आला नाही, तर साईल याला कायदेशीर पध्दतीने समन्स न बजविल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. त्यामुळे तो जबाब नोंदविण्यासाठी हजर झाला नसल्याचे सांगितले.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो