शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एल्गार परिषदेच्या तपासासाठी एनआयए'ची टीम पुण्यात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 20:34 IST

या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांना त्यासाठीचे पत्र देण्यात आले.

ठळक मुद्देएनआयएचं पथक पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी कागदपत्रं ताब्यात देण्याची मागणी पुणे पोलिसांकडे केली. पुणे पोलिसांनी त्यांच्याकडे शासनाकडून अजून अधिकृत पत्र न आल्याने आज तरी कागदपत्र दिली नसल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.

पुणे - महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये एल्गार परिषदेच्या तपासावरुन संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच आज केंद्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत. एनआयएच्या या पथकानं पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात एल्गार परिषद प्रकरणाच्या कागदपत्रांची तपासणीसाठी मागणी केली. विशेष म्हणजे एनआयएचं पथक पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी कागदपत्रं ताब्यात देण्याची मागणी पुणे पोलिसांकडे केली. यावेळी एनआयए'चे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांच्यासह ८ जणांची टीम पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांना त्यासाठीचे पत्र देण्यात आले. मात्र, पुणे पोलिसांनी त्यांच्याकडे शासनाकडून अजून अधिकृत पत्र न आल्याने आज तरी कागदपत्र दिली नसल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. 

एनआयएच्या या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीच्या स्थापनेची मागणी केली होती. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्रही लिहिलं होतं. मात्र, यानंतर तात्काळ केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे वळवला आहे. त्यामुळे या प्रकरणात काही संशयास्पद असल्याची शंका स्वतः शरद पवार यांनी व्यक्त केली. केंद्राने प्रकरण एनआयएकडे दिल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्येच एनआयएची टीम पुण्यात दाखल झालं आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे आता राज्य आणि केंद्र सरकारमधील वाद पेटण्याची लक्षणं दिसत आहेत. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPuneपुणेPoliceपोलिस