शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
4
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
5
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
6
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
7
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
8
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
9
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
10
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
11
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
12
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
13
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
14
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
15
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
16
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
17
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
18
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
19
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
20
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा

अटकेच्या आदल्या रात्री साहिलनं हत्येचं रहस्य उघडलं; ऐकून नवविवाहित बायको हादरली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 2:44 PM

जेव्हा दिल्ली पोलिसांकडून साहिलवर दबाव येऊ लागला तेव्हा तो घाबरला होता असं पोलिसांनी कोर्टात सांगितले.

नवी दिल्ली - निक्की हत्याकांडातील आरोपी साहिल गहलोतला कोर्टाने बुधवारी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. निक्कीची हत्या करून साहिलने ढाब्याच्या फ्रीजमध्ये मृतदेह ठेवला होता त्यानंतर त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. निक्कीच्या हत्येचं रहस्य आरोपी साहिलने लग्नानंतर ३ दिवसांपर्यंत लपवून ठेवले होते. मात्र अटकेच्या आदल्या रात्री साहिलने त्याच्या पत्नीसमोर हे गूढ उकललं असं पोलिसांनी कोर्टात म्हटलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा दिल्ली पोलिसांकडून साहिलवर दबाव येऊ लागला तेव्हा तो घाबरला होता. त्याने नव्या नवरीला निक्कीच्या हत्येबद्दल सांगितले आणि त्यानंतर तिला माहेरी जा असं म्हटलं. निकटवर्ती गावाच्या विधवा महिलेच्या एकलुती एक मुलीसोबत डिसेंबर २०२२ मध्ये साहिलच्या लग्नाची बोलणी झाली होती. लग्नाची तारीखची निश्चित झाली. दोघांच्या कुटुंबाने १० फेब्रुवारीला लग्न करायचं ठरवलं. लग्नाच्या दिवशी सकाळी साहिलने निक्की यादवची हत्या केली होती. त्यामुळे त्याच्या मनात अन्य विचार घोंगावत होते. 

मात्र, लग्नानंतर तीन दिवस त्याने पत्नीला याबाबत काहीही सांगितले नाही. दुसरीकडे, घटनेची माहिती मिळताच नजफगडच्या बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्याचे पोलीस पहिल्या दिवसापासून साहिलचा शोध घेत होते. पोलिसांचा दबाव वाढल्यावर १३ फेब्रुवारीच्या रात्री साहिलने पत्नीला सांगितले की, मी एका मुलीची हत्या केली आहे त्यामुळे तू माहेरी जा. नवविवाहित महिलेने मंगळवारी सकाळी आईला फोन करून सर्व प्रकार सांगितला. विधवा आईने कुटुंबातील आणि शेजारच्या काही लोकांना मुलीच्या सासरी पाठवले. याठिकाणी दोन्ही बाजूंच्या चर्चेनंतर ठरल्याप्रमाणे लोकांनी मुलीसाठी दिलेला हुंडा आणि मुलीला घेऊन परत आले.

साहिलच्या विश्वासघातामुळे आई-लेकीला बसला धक्कालग्नानंतर काही काळ त्रास सहन करत असलेली आई आणि मुलीला या प्रकाराचा खुलासा होताच धक्का बसला. मुलीच्या वडिलांचे सुमारे २० वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून आई-मुलगी कष्टाने जगत होत्या. कधी आई आपल्या मुलीला घेऊन माहेरी जायची तर कधी ती गावातच राहायची. गेल्या अनेक वर्षांपासून आई व मुलगी दूध विकून आयुष्य जगत होत्या. गावातील सरकारी शाळेत शिकून मुलगी बारावी उत्तीर्ण झाली. पैसे जमा करून आईने मुलीचे लग्न साहिलसोबत केले. आता पुन्हा आईला मुलीच्या भवितव्याची चिंता लागली आहे.