शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : चारपैकी 'या' दोषी आरोपीने सुप्रीम कोर्टात दाखल केली पुनर्विचार याचिका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 20:57 IST

देशाची राजधानी असलेली नवी दिल्ली १६ डिसेंबर २०१२ ला सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरून केली होती.

ठळक मुद्देनिर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सहा आरोपींविरोधात चालला.कारागृह प्रशासनाने जास्तीत जास्त वजन कमी असलेल्या कैद्यांची डमी बनवून त्यांना फाशी देऊन पहिली.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणातील चार आरोपींना फाशी देण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. या दोषींपैकी एक अक्षय कुमार सिंह याने सुप्रीम कोर्टात फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून अक्षयने फाशीच्या शिक्षेच्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याची मागणी केली आहे. देशाची राजधानी असलेली नवी दिल्ली १६ डिसेंबर २०१२ ला सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरून केली होती. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली होती.निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सहा आरोपींविरोधात चालला. सहापैकी एक अल्पवयीन आरोपी दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगून आला असून बसचालक असलेला राम सिंह याने खटल्यादरम्यान तुरुंगात आत्महत्या केली. तसेच दोषी आरोपी  मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार सिंह यांना फास्ट ट्रॅक कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, हैदराबाद एन्काउंटरनंतर निर्भया सामूहिक बलात्कारातील चारही दोषींना फासावर चढविण्यासाठी तिहार कारागृहात तयारी सुरु केली असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, या प्रकरणी तिहार कारागृह प्रशासनाला अद्याप अंतिम पत्र प्राप्त झालेले नाही. कारागृह प्रशासनाने जास्तीत जास्त वजन कमी असलेल्या कैद्यांची डमी बनवून त्यांना फाशी देऊन पहिली. डमी ही १०० किलो वाळू भरून तयार केली होती. डमी बनवलेल्या पुतळ्यास १ तास फासावर लटकवून ठेवले होते.दया याचिकेसंबंधित आणखी काही तथ्य*राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या कार्यकाळात ३२ दया याचिका निकाली काढल्या, २८ फाशीची शिक्षा कायम ठेवली आणि ४ प्रकरणात माफी दिली.

*सर्वाधिक दया याचिका बरखास्तीचे रेकॉर्ड माजी राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांनी १९८७ ते १९९२ दरम्यान ४४ याचिका फेटाळल्या.

*प्रतिभाताई पाटील या फाशी देण्याच्या विरोधात होत्या आणि त्यांनी आपल्या कार्यकाळात ३० दया याचिका स्वीकारल्या. तसेच फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची विनंती केली.

*धनंजय चटर्जीला १४ ऑगस्ट २००६ साली कोलकाता येथे बलात्काराच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली होती.

*अ‍ॅम्नेस्टी इंडियाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशभरातील न्यायालयांमध्ये स्वतंत्र प्रकरणात १३६ लोकांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला होता आणि खालच्या कोर्टापासून वरच्या     कोर्टापर्यंत ४०० हून अधिक खटले प्रलंबित आहेत. ज्यावर अंतिम निकाल लागलेला नाही.

* खटला किती जुना आहे हे न पाहता तर राष्ट्रपती दया याचिकेवर याच्या मेरीटनुसार निर्णय घेतात.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNew Delhiनवी दिल्ली