शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

तब्बल 19 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर झाली निर्दोष मुक्तता!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 6:34 PM

Odisha : पोलिसांनी मयूरभंज जिल्ह्यातील जसीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बलरामपूर गावातील रहिवासी हबिल सिंधू या व्यक्तीला काळी जादू करून 3 जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

नवी दिल्ली : ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील उच्च न्यायालयाने एका हत्येच्या प्रकरणात 19 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने 3 खून खटल्यातून हबिल सिंधू नावाच्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली. तसेच, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या हबिल सिंधूला सन्मानपूर्वक सोडण्याचे आदेश देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, 2003 मध्ये पोलिसांनी मयूरभंज जिल्ह्यातील जसीपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बलरामपूर गावातील रहिवासी हबिल सिंधू या व्यक्तीला काळी जादू करून 3 जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने हबिल सिंधूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, हबिल सिंधूने जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी उच्च न्यायालयाचा सहारा घेतला होता. 

त्यानंतर उच्च न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी वकिलांकडून (एमिकस क्युरी) पुन्हा तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सरकारी वकिलांनी सिंधूविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यातील 32 पानी कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली आणि त्याचा अहवाल उच्च न्यायालयात दिला. ज्याच्या आधारावर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

हबिल सिंधूला जन्मठेपेची शिक्षा झाली, तेव्हा त्याचे वय जवळपास 40 वर्षे होते. 19 वर्षांनंतर हबिल सिंधूला उच्च न्यायालयासमोर कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने तिला निर्दोष घोषित करण्यात आले. निर्दोष सिद्ध झाल्यानंतर हबिल सिंधू खूपच आंनदी दिसून आला. द हिंदूमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हबिल सिंधूने सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयामुळे मी खूप खूश आहे. जवळपास 19 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. हा काळ खूप कठीण होता. आता गावी जाऊन शेती करणार आहे.

टॅग्स :jailतुरुंगCourtन्यायालय