शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केवळ निर्भयाच्या गुन्हेगारांना नाही तर समाजातील 'या' दुष्प्रवृत्तीला मिळालेली शिक्षा - उज्ज्वल निकम

By पूनम अपराज | Updated: March 20, 2020 11:56 IST

आम्ही जेव्हा कठोर शिक्षेची मागणी करतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रवृत्तीच्या प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात, असे पुढे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले.

ठळक मुद्देया दोषींप्रमाणे कोणी कायद्याशी खेळतं किंवा आव्हान देतं ते अत्यंत चुकीचं आहे. लोकांमध्ये कायद्याप्रती सन्मान आणि विश्वास निर्माण झाला पाहिजे. फासावर लटवलेल्या चार नराधमांच्या वकिलाने न्यायव्यवस्थेचा जो वेळ वाया घालवला, ते व्यावसायिक गैरवर्तन म्हणून आढळल्यास बार कौंसिलसह न्यायालय देखील त्याचा गंभीरपणे विचार करू शकतं.

पूनम अपराज 

मुंबई -  संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्ली बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने  खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले आणि गेल्या सव्वासात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला. ही शिक्षा फक्त या चार गुन्हेगारांना झालेली नाही तर समाजातील दुष्प्रवृत्तीला मिळालेली शिक्षा आहे अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.आम्ही जेव्हा कठोर शिक्षेची मागणी करतो तेव्हा ती केवळ गुन्हेगारासाठी नाही तर समाजातील अशा प्रवृत्तीच्या प्रत्येकासाठी असते जे अशा कृत्याचा विचार करतात, असे पुढे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले. फासावर लटवलेल्या चार नराधमांच्या वकिलाने न्यायव्यवस्थेचा जो वेळ वाया घालवला, ते व्यावसायिक गैरवर्तन म्हणून आढळल्यास बार कौंसिलसह न्यायालय देखील त्याचा गंभीरपणे विचार करू शकतं. तसेच चार दोषींनी फाशी लांबविण्यासाठी जो काही कायदेशीर पर्यायांचा फायदा घेतला. त्यामुळे न्यायालयाच्या न्यायव्यवस्थेवर शंका निर्माण करणारी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. मात्र, अखेर न्याय मिळाला. या दोषींप्रमाणे कोणी कायद्याशी खेळतं किंवा आव्हान देतं ते अत्यंत चुकीचं आहे. लोकांमध्ये कायद्याप्रती सन्मान आणि विश्वास निर्माण झाला पाहिजे. एखादी याचिका कितीवेळा केली पाहिजे यावर विचार होणं गरजेचं आहे. पुनर्विचार याचिकेसाठीही मर्यादा असायला हवी असे देखील निकम पुढे म्हणाले. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपUjjwal Nikamउज्ज्वल निकमMumbaiमुंबई