मेरठमधील सौरभ हत्याकांडामध्ये दररोज नवीन खुलासे होत आहेत. मुस्कान आणि साहिल या दोघांनी हिमाचलहून परतल्यानंतर ज्या ड्रममध्ये सिमेंट मिसळलेले मृतदेहाचे १५ तुकडे भरले होते तो ड्रम फेकून देण्याची तयारी सुरू केली होती. पण इथेच त्याने चूक केली. ज्या निळ्या ड्रममध्ये त्यांनी सौरभच्या शरीराचे तुकडे सिमेंटमध्ये मिसळून ठेवले होते ते खूप जड झाले होते.
"मोठ्या साईजचं Condom घेऊन ये..."; बड्या टेक कंपनीच्या फाऊंडरनं पत्नीचं चॅट उघड केलं
मृतदेह लपवताना मुस्कान आणि साहिलला याचा अंदाज नव्हता. पण जेव्हा संपूर्ण ड्रम सिमेंटने भरले आणि त्यात शरीराचे काही भागही होते तेव्हा त्याचे वजन खूप वाढले. पोलीस तपासानुसार, मुस्कान आणि साहिल या दोघांनी ३ मार्चच्या रात्री सौरभची हत्या केली होती. त्यानंतर त्याच्या शरीराचे १५ तुकडे करण्यात आले.
हे तुकडे ओल्या सिमेंटमध्ये मिसळले होते आणि ड्रममध्ये भरले होते. यानंतर, मुस्कान आणि साहिल हिमाचलला दोन आठवड्यांच्या सहलीसाठी निघाले. परतल्यानंतर कुठेतरी त्याची विल्हेवाट लावण्याचं त्या दोघांनी नियोजन केले. १७ मार्च रोजी सुट्टी संपल्यानंतर दोघेही याच उद्देशाने परतले. यासाठी त्याने इतर काही कामगारांना बोलावले आणि त्यांना ड्रम उचलून कुठेतरी फेकण्यास सांगितले. त्या कामगारांनीही हे करण्याचा प्रयत्न केला, पण जास्त वजनामुळे ते उचलू शकले नाहीत. हे करत असताना ड्रमचे झाकण एका बाजूने उघडू लागले. त्यामुळे मृतदेहाच्या कुजलेल्या तुकड्यांमधून दुर्गंधी येऊ लागली. कामगारांनाही याबद्दल संशय आला.
त्या ड्रमचे वजण वाढल्यामुळे त्या दोघांनाही तो ड्रम उचलता आला नाही. मुस्कान तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आणि साहिल त्याच्या खोलीत निघून गेला. तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचलेल्या मुस्कानने सुरुवातीला सौरभच्या हत्येचा दोष त्याच्या बहिणी आणि मेहुण्यावर टाकण्याचा प्रयत्न केला. पण मुस्कानच्या आई आणि वडिलांना तिने सांगितलेल्या घटनेत विसंगती आढळली.
एका शेजाऱ्याने सांगितले की, साहिल अनेकदा मुस्कानच्या घरी येत असे. याबद्दल अजिबात शंका नव्हती. मुस्कानचे वर्तन खूप चांगले होते. त्यामुळे तिच्या वागण्याने कधीही शंका आली नाही.
शेजाऱ्याने दिलेली माहिती अशी की, १७ मार्च रोजी मुस्कानला एकटे शांत बसलेले पाहिले. ती ड्रमची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार करत होती. तिने यासाठी मजूर बोलावले होते, पण मजूरही तो ड्रम उचलू शकले नाहीत. सौरभ आणि मुस्कानचा २०१६ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मुस्कानने २०१९ मध्ये पिहू नावाच्या मुलीला जन्म दिला.