शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपुरातील अजनीत थरार : पत्नी व तिच्या प्रियकराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:00 IST

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. रविवारी मध्यरात्री अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देकुऱ्हाडीने दोघांवरही घाव, अनैतिक संबंधातून हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. रविवारी मध्यरात्री अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. किरण कुवरलाल बरमय्या आणि शिवा बालाघाटी अशी मृतांची नावे आहेत, तर कुवरलाल बरमय्या (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे.

मानेवाडा बेसा मार्गावरील कल्याणेश्वर नगर जवळच्या बाळकृष्ण नगरात भाड्याच्या खोलीत कुवरलाल आणि त्याची पत्नी राहत होते. तो बांधकामस्थळी मिस्त्रीचे काम करत होता, पत्नी किरणही त्याच्यासोबत कामाला जायची. शिवादेखील मजुरीचे काम करत होता. शिवा नातेवाईक असल्याचे किरणने कुवरलालला सांगितले होते. तो अधूनमधून कुवरलालच्या घरी यायचा. अलीकडे त्याचे घरी येणे वाढले होते. काही दिवसांपूर्वी अचानक घरी परतलेल्या कुवरलालला शिवा आणि किरण संशयास्पद स्थितीत दिसले. त्यामुळे या दोघांच्या संबंधावर कुवरलाल संशय घेऊ लागला. त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याची कुवरलालला शंका होती.पोलिसांच्या माहितीनुसार, शिवा दोन दिवसापासून कुवरलालच्या घरी थांबला होता. रविवारी रात्री शिवा, कुवरलाल आणि किरण दारू पिऊन जेवले. त्यानंतर हे तिघे झोपी गेले. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास शिवा आणि किरण खोलीतून बाहेर पडले. झोपेचे सोंग घेऊन पडलेला कुवरलाल त्यांच्यावर नजर ठेवून होता. काही वेळानंतर तो बाहेर आला. तेव्हा शिवा आणि किरण हे दोघे त्याला अंधारात जवळजवळ दिसले. आधीच चिडून असलेल्या कुवरलालने शिवा आणि किरणवर कुºहाडीचे घाव घालून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. किंकाळी ऐकून शेजाऱ्यांनी खिडकीतून बघितले तेव्हा त्यांना हा थरारक प्रकार दिसला. त्यांनी अजनी पोलिसांना कळविले. ठाणेदार प्रदीप रायान्नावार सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.त्यावेळी कुवरलाल तेथेच बसून होता. पोलिसांनी दोघांचे मृतदेह मेडिकलमध्ये पाठविले आणि कुवरलालला ताब्यात घेतले. त्याने घटनास्थळीच पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली.दोघांचेही दुसरे लग्नपोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, कुवरलाल, किरण आणि शिवा हे तिघेही बालाघाटमधील रहिवासी आहेत. कुवरलालला पत्नी आणि मुले आहेत. मात्र, त्यांना सोडून तो नागपुरात आला. किरणलाही पती आणि मुले आहेत. मात्र तिनेही नागपुरात येऊन कुवरलालसोबत गेल्या काही वर्षांपासून संसार थाटला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनnagpurनागपूर