शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लग्नाचे वचन देऊन ठेवलेले शरीर संबंधास सरसकट बलात्कार मानू नये

By पूनम अपराज | Updated: December 19, 2020 19:15 IST

दिल्ली उच्च न्यायालयाने केले स्पष्ट   

ठळक मुद्दे‘जर एखादी महिला आपल्या मर्जीने खूप काळ शरीर संबंध ठेवत असेल तर तो बलात्कार नाही’, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

लग्नाचे वचन देऊन ठेवण्यात आलेले शरीर संबंध सरसकटपणे बलात्कार मानले जाऊ नयेत’, असं दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या एका सुनावणीत निरीक्षण नोंदवले आहे. ‘जर एखादी महिला आपल्या मर्जीने खूप काळ शरीर संबंध ठेवत असेल तर तो बलात्कार नाही’, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

बऱ्याच कालावधीपर्यंत एका व्यक्तीबरोबर शरीर संबंध ठेवल्यानंतर एका महिलेने त्या व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालय सुनावणी करत असताना हे महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. या प्रकरणी ही याचिका फेटाळत उच्च न्यायालयाने म्हटले की, ‘जर दोघांमधील शरीरसंबंध खूप काळ असतील तर केवळ लग्नाचं वचन देऊन ते ठेवण्यात आले म्हणून त्याला बलात्कार म्हणता येणार नाही’.

‘काही प्रकरणांमध्ये लग्नाचं वचन हे शरीर संबंधांच्या लालसेपोटी दिलेलं असू शकतं. मात्र, महिलेची इच्छा नसल्याने अशा प्रकरणांमध्ये महिला एखाद वेळेसच पूर्ण संमतीने शरीर संबंधांसाठी होकार देते. पण जेव्हा प्रियकराचा खोटेपणा तिच्या लक्षात येतो तेव्हा ती आपली संमती नसल्याचंही स्पष्ट करते. त्यामुळे महिलेला लग्नाचं अमिष दाखवून शरीरसंबंधासाठी तयार करणं म्हणजे महिलेच्या सहमतीचा दुरुपयोग करणं आहे. त्यामुळे केवळ अशा मर्जी विरोधात ठेवण्यात आलेल्या शरीर संबंधांच्या प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधान सेक्शन 375 अंतर्गत बलात्काराची शिक्षा होऊ शकते’, असं न्यायालयाने नमूद केले आहे.

न्यायमूर्ती विभू बाखरू यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. खूप काळापर्यंत एकत्र असलेल्या प्रेमीयुगुलात शरीरसंबंध होते. लग्नासाठीचं वचनही तिच्या जोडीदाराकडून महिलेला देण्यात आलं होतं. मात्र नंतर हे नातं संपुष्टात आल्यानंतर त्या महिलेने बलात्काराची तक्रार केली. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कारmarriageलग्नdelhiदिल्ली