शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान
2
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
3
अजितदादांच्या आमदाराचा पारा चढला; महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनाच इशारा
4
"या कामाची पोचपावती जनता निवडणुकीत देईल"; टोलमाफीच्या निर्णयावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
5
PAK vs ENG : शाहीनला मोठा झटका! PCB ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता आफ्रिदीची लक्षवेधी पोस्ट
6
Surbhi Chandna : "रोज रात्री रडायची..."; १३ वर्षे डेट केल्यावर अभिनेत्रीला लग्न केल्याचा पश्चाताप, झाली भावुक
7
२०१९ नंतर पहिल्यांदाच एका दिवसात Dmart च्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांना कसली भीती?
8
बाबा सिद्दिकीच नाही तर या नेत्यांच्या हत्यांनीही हादरली होती मुंबई, समोर आला होता अंडरवर्ल्डचा हात
9
“CMपदाच्या चेहऱ्यापेक्षा महाभ्रष्ट महायुती सरकार घालवणे महत्त्वाचे”: बाळासाहेब थोरात
10
Rohit Sharma Hardik Pandya, Mumbai Indians IPL 2025: हार्दिक पांड्या, रोहित शर्मा अन् मुंबई इंडियन्स... जयवर्धने हेड कोच होताच आकाश चोप्राची मोठी भविष्यवाणी
11
जेव्हा करीनाने बहिणीला पहिल्यांदा सांगितलं होतं सैफबद्दल, तेव्हा करिश्माने दिली होती ही रिअ‍ॅक्शन
12
Kojagiri Purnima 2024: कोजागरी विशेष 'हे' लक्ष्मी मंत्र; करतील कर्जमुक्त; वाचा हे विशेष तोडगे!
13
Raj Thackeray reaction, Toll Free in Mumbai: "सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
14
Kojagiri Purnima 2024: कोजागरी पौर्णिमेला का खेळला जातो महाभोंडला? हा केवळ खेळ आहे की पुजा? वाचा!
15
इमर्जिंग आशिया चषकासाठी Team India ची घोषणा; तिलककडे नेतृत्व, ऋतुराज गायकवाडला डच्चू
16
'या' योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना करू शकतं १५ लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज कसा करावा?
17
प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'ची कळी खुलेना? ३ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...
19
Reliance Jio नं लाँच केले २ नवे रिचार्ज प्लॅन्स; केवळ १ रुपयाचा फरक, कोणता आहे बेस्ट? 
20
स्वप्निलला राज्य सरकारकडून २ कोटी! वडील सुरेश कुसाळेंच्या नाराजीनंतर मोठी घोषणा

वाहन चोरी करणाऱ्या त्रिकुटाच्या शांतीनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; १४ दुचाकींसह ४ रिक्षा जप्त 

By नितीन पंडित | Published: May 22, 2023 5:32 PM

पोलिसांनी सतर्कतेने तपास करीत वाहन चोरीतील अट्टल त्रिकुटास जेरबंद करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले आहे.

भिवंडी: शहरात वाहन व मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच पोलिसांनी सतर्कतेने तपास करीत वाहन चोरीतील अट्टल त्रिकुटास जेरबंद करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले आहे.या तीन जणांच्या एका टोळीकडून तब्बल १४ दुचाकी ४ रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

शहरात वाहन व मोबाईल चोरी च्या घटना वाढलेल्या असताना पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सर्व पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी यांना पोलिस ठाणे हद्दीत सतर्कतेने गस्त घालण्याचे आदेश दिल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार,शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर,पोलीस निरीक्षक (प्रशा) निलेश बडाख,पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे,संतोष तपासे,पोलिस हवालदार रविंद्र चौधरी,महेश चौधरी, रिजवान सैयद,पोलिस नाईक किरण जाधव,श्रीकांत पाटील,किरण मोहीते,पोलिस शिपाई रविंद्र पाटील,नरसिंह क्षीरसागर,दिपक सानप,मनोज मुके,तौफीक शिकलगार,विजय ताटे या पोलिस पथकाने गुप्त बातमीदारा व तांत्रिक तपासाद्वारे बिलाल रिजवान अंसारी,वय २७ रा.गैबीनगर यास त्याच्या मूळ गाव असलेल्या मालदा, मालेगाव जि.नाशीक यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करून भिवंडीतून मोहमद सैफ शफीक खान, वय २४,रा.शांतीनगर,राहील फकीरउल्ला अंसारी,वय २६ रा.गैबीनगर यांना ताब्यात घेवुन त्याचेकडे शांतीनगर पोलीस ठाणे येथील ११ गुन्हे, निजामपुरा पोलीस ठाणे येथील ३ गुन्हे,नारपोली पोलीस ठाणे, भिवंडी शहर पोलीस ठाणे, भिवडी तालुका पोलिस ठाणे येथील प्रत्येकी १ अशा एकूण १७ गुन्ह्यांची उकल करीत त्यांचे कडुन ७ लाख ९० हजार रुपये किमतीच्या १४ दुचाकी व ४ रिक्षा अशी १८ वाहने जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सोमवारी दिली आहे.

टॅग्स :RobberyचोरीbhiwandiभिवंडीPoliceपोलिस