शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

अर्णब गोस्वामींना तळोजाला हलविण्यामागे वेगळेच कारण; तपास अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

By हेमंत बावकर | Updated: November 8, 2020 20:20 IST

Arnab Goswami News: गोस्वामींना अलिबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेत आरोपींसाठी बनविण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.

मुंबई : अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. याच्या मागे त्यांची सुरक्षा कारणीभूत नसून गोस्वामींनी अलिबागच्या शाळेत बनविलेल्या सब जेलमध्ये मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केल्याचे समोर आले आहे. 

गोस्वामींना अलिबाग नगरपालिकेच्या मराठी शाळेत आरोपींसाठी बनविण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तळोजा जेलमध्ये नेत असताना गोस्वामी यांनी पोलीस व्हॅनच्या खिडकीतून ओरडत शनिवारी अलिबाग जेलरनी मारहाण केल्याचा आरोप केला. तसेच जबरदस्तीने तळोजा जेलमध्ये नेण्यात येत असून माझ्या जिवाला धोका असल्याची ओरड मारली. तसेच न्यायालयाला माझी मदत करण्यास सांगा, असेही गोस्वामी बोलले. 

नाईक आत्महत्या प्रकरणाच तपास करणारे पोलीस अधिकारी जमील शेख यांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी अर्णब गोस्वामी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे समजले. ते दुसऱ्या कोणाचातरी फोन वापरत होते. आम्ही त्यांचा फोन आधीच जप्त केला आहे. या प्रकारानंतर गोस्वामींकडे हा फोन कसा आला याचा तपासणी अहवाल लिहिण्याचे पत्र तुरुंग अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. या अहवालानुसार आम्ही गोस्वामी यांना तळोजा जेलमध्ये हलविले. 

दरम्यान, माझ्या जीवाला धोका आहे. अटकेत असताना मला मारहाण करण्यात आली. मला माझ्या वकिलांसोबत बोलू दिले जात नाही आहे, असा आरोप रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.

नारायण राणेंकडून गोस्वामींची पाठराखणनारायण राणेंनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारवर बाण चालवले आहेत. 'अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळया तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार व पोलिसांनी चालवलाय. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होतेय. गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका झाल्‍यास, त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल.', असे ट्विट नारायण राणेंनी केलंय. 

पोलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावर ९ नाव्हेंबरला सुनावणीअन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना आणखी दोन दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. या प्रकरणी आता सोमवारी, ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला रायगड पोलिसांनी रायगडच्या जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्याबाबतची सुनावणी शनिवारी पार पडली. सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश कोर्टात दाखल झाले आणि सुनावणीला सुरुवात झाली.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीAnvay Naikअन्वय नाईकSuicideआत्महत्याPoliceपोलिसjailतुरुंग