शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धक्कादायक ! मैत्रीण बोलली नसल्याने युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 20:55 IST

राजारामपुरीतील घटना : बारावीच्या पेपरनंतर कृत्य 

ठळक मुद्देमाहिती व तंत्रज्ञान विषयाचा बारावीचा शेवटचा पेपर देवून आलेनंतर श्रीरामने आपले जिवन संपवून घेतल्याचा धक्का त्याच्या कुटूूंबियांना बसला आहे.. सहा महिन्यापासून दोघे बहिण-भाऊ माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या राजारामपूरी पाचवी गल्ली येथील पंचशिल अपार्टमेंन्टमधील फलॅटमध्ये भाड्याने राहत होते.

कोल्हापूर - मैत्रीण बोलत नसल्याच्या नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्यांने राहत्या फलॅटमध्ये गफळास घेवून आत्महत्या केल्याची ºहदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. श्रीराम संजय कोळी (वय १७, रा. गोंदवले, ता. मान, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. माहिती व तंत्रज्ञान विषयाचा बारावीचा शेवटचा पेपर देवून आलेनंतर श्रीरामने आपले जिवन संपवून घेतल्याचा धक्का त्याच्या कुटूूंबियांना बसला आहे. त्याने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 

पोलीसांनी सांगितले, श्रीराम कोळी हा चाटे स्कुलमध्ये बारावीमध्ये शिकत होता. त्याची बहिण तेजश्री बी. ई. मॅकॅनिकल इंजिनिअर आहे. ती कोल्हापूरातच खासगी कंपनीत नोकरी करते. सहा महिन्यापासून दोघे बहिण-भाऊ माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या राजारामपूरी पाचवी गल्ली येथील पंचशिल अपार्टमेंन्टमधील फलॅटमध्ये भाड्याने राहत होते. श्रीरामची बारावीची परिक्षा सुरु आहे. तो हुशार होता. मंगळवारी त्याचा शेवटचा माहिती व तंत्रज्ञान विषयाचा पेपर होता. सकाळी बहिणीकडून तीनशे रुपये घेवून तो पेपरला गेला. जाताना त्याच्या चेहºयावर कुठलाही तणाव किंवा नैराश्य नव्हते. दूपारी पेपरहून आलेनंतर तीनच्या सुमारास बहिणीने त्याला फोन करुन पेपर कसा गेला याची विचापूस केली. त्याने चांगला गेला असे सांगुन फोन ठेवला. बहिण तेजश्रीने तो असे काही करुन घेईल असे स्वप्नातही पाहिले नव्हते. सायंकाळी पाचच्या सुमारास ती घरी आली. दरवाजा आतून बंद होता. तिने श्रीरामला हाक दिली, परंतू आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता श्रीराम सिलींग फॅनला उटकत असल्याचे दिसून आले. हे दूष्य पाहून ती जागेवरच कोसळली. आरडाओरड करु लागल्याने आजूबाजूचे रहिवाशी आले. येथील काही तरुणांनी दरवाजा मोडून काढला असता श्रीरामने गळफास घेतल्याचे दिसून आले. या प्रकाराची वर्दी राजारामपूरी पोलीसांना दिली. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठविला. श्रीरामने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलीसांना मिळून आली. भावाच्या विरहाने अक्रोश करणाºया तेजश्रीला माजी महापौर माळवी यांनी धीर दिला. 

श्रीरामचे वडील डॉक्टर आहेत. आई गृहीणी आहे. मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी बहिणीसोबत त्याला कोल्हापूरला पाठविले होते. त्याचा सर्वजण लाड खूप करीत. तो हुशारही होता. त्याच्या आत्महत्येची माहिती समजताच आई-वडीलांना मानसिक धक्का बसला. नातेवाईकांसोबत ते कोल्हापूरला येण्यासाठी निघाले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीPoliceपोलिस