शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

फी भरण्यास पैसे नसल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या; शिक्षकाकडून अपमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 01:24 IST

घरची परिस्थिती हलाखीची असताना वडील टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, आठवीत शिकणाऱ्या सागर दुबे (१४) याच्याकडे शाळेत भरण्यासाठी फीचे पैसे नसल्याने, तसेच त्यासाठी शिक्षकांकडून चाललेल्या तगाद्यामुळे त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली.

नालासोपारा (पालघर) : घरची परिस्थिती हलाखीची असताना वडील टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, आठवीत शिकणाऱ्या सागर दुबे (१४) याच्याकडे शाळेत भरण्यासाठी फीचे पैसे नसल्याने, तसेच त्यासाठी शिक्षकांकडून चाललेल्या तगाद्यामुळे त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना वसईतील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.सागर हा आदर्श चाळीत आई-वडील व आपल्या लहान भावासह राहत होता. वडील टॅक्सी चालक आहेत. आत्महत्या करताना सागरने सुसाइड नोट लिहून ठेवली होती. वसई पूर्व येथील गोलाई नाका या परिसरातील इमानुल मिशन स्कूलमध्ये सागर नववीत शिकत होता. सागरची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याला फी भरणे शक्य होत नव्हते. त्यासाठी शिक्षकांकडून सतत विचारणा होत होती. एका शिक्षकाने भर वर्गात फी कधी भरणार? असे विचारले. जर फी भरली नाही, तर परीक्षेला बसू देणार नाही, असेही सांगितले होते. त्यानंतर, सागरच्या वडिलांनी शाळेची फी लवकर भरू, असे आश्वासन त्याला दिले होते.नवव्या इयत्तेत शिकणारा सागर अभ्यासात हुशार होता. शुक्रवारी शिक्षकाने लवकरात लवकर फी भर, अन्यथा परीक्षेला मुकावे लागेल, असे त्याला सांगितले. त्यानंतर, त्याने ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली. वडील शिक्षकांना भेटण्यासाठी शाळेत गेले. मात्र, शिक्षक भेटले नाहीत. सोमवारी सागर शाळेत जाऊन दुपारी १ वाजता घरी परतला. वडील कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर सायंकाळी ७ वाजता सागरने गळफास घेऊन आत्महत्या केली. वालीव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.मोबाइल गेला चोरीलायाबाबत अशीही माहिती समोर आली आहे की, सागरचा मोबाइल दोन दिवसांपूर्वी चोरीला गेला होता. त्यामुळे तो तणावाखाली होता. त्या तणावातून त्याने हे पाऊल उचलले आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारी