शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
3
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
4
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
6
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
7
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
8
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
9
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
11
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
12
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
13
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
15
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
16
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
17
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
18
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
19
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
20
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम

निलंबितांविरुद्ध ३ महिन्यांत दोषारोपपत्र दाखल न झाल्यास होणार निलंबन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 22:00 IST

सेवा नियमावलीच्या तरतुदी बदल; अन्यथा निलंबन होणार समाप्त

ठळक मुद्देयाबाबत पुन्हा बुधवारी निर्देश जारी करण्यात आले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.त्यांचे निलंबन समाप्त होवून पुन्हा सेवेत रुजू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

जमीर काझीमुंबई - शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विविध कारणास्तव निलंबित झालेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब आहे. त्यांच्यावरील दोषारोप पत्र विभागाला कोणत्याही परिस्थितीत ३ महिन्याच्या कालावधीत दाखल करावे लागणार आहे. अन्यथा त्यांचे निलंबन समाप्त होवून पुन्हा सेवेत रुजू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात दिलेल्या आदेशानुसार निलंबित सेवा नियमावलीच्या तरतुदीमध्ये हा बदल करण्यात आला आहे.त्यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्याच्या नियमाची काटकोरपणे अंमलबजावणी करण्याची सूचना सामान्य प्रशासन विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह(एसीबी)सर्व खात्यांना दिल्या आहेत. याबाबत होणाऱ्या दिरंगाईमुळे निलंबितांना कामाविना फुकटचा मोबदला द्यावा लागतोच,शिवाय कालांतराने त्यांचा निलंबित कालावधीही सेवेत गृहित धरला जातो. त्यामुळे याबाबत पुन्हा बुधवारी निर्देश जारी करण्यात आले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.लोकसेवक म्हणून काम करीत असताना गैरकृत्य किंवा पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्याला निलंबित केले जाते. यामध्ये प्रामुख्याने विभागातर्गंत प्रकरणासह लाचलुचपत विभागाच्या कारवाईचे प्रमाण अधिक आहे. फौजदारी स्वरुपाच्या गुन्ह्यामध्ये संबंधितांना अटक होवून ४८ तास किंवा त्याहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) कलमानुसार आपसुक निलंबन होते. त्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी, गुन्ह्याचा सविस्तर तपास करुन त्याचे ९० दिवसाच्या आत दोषारोपपत्र बनवावे लागते. त्यावर संबंधित अधिकारी,कर्मचारी ज्या विभागात कार्यरत आहे,त्या प्रमुखाची मंजुरी घेवून न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे लागते. मात्र अपवाद वगळता बहुतांश प्रकरणामध्ये निर्धारित मुदतीमध्ये दोषारोप पत्र दाखल होत नसल्याची परिस्थिती आहे. इतकेच नव्हे तर काही प्रकरणात तपास अधिकाऱ्याकडून त्याबाबत संबंधितांचे जबाब नोंदविण्याचे कामही होत नाही. त्यामुळे निलंबित व्यक्ती विभागाकडे अर्ज करुन पुन्हा सेवेत रुजू होण्यास पात्र ठरतो.निलंबिताविरुद्ध ३ महिन्याच्या आत आरोपपत्र दाखल झाल्यास त्याच्या गुन्ह्याचे स्वरुपाचा विचार करुन त्याचा निलंबन कालावधी वाढविता येतो, किंवा न्यायालयीन खटल्याच्या अधीन राहून त्याला सेवेत पुर्न:स्थापित करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र दोषारोप पत्रच दाखल न झाल्यास त्याचे सेवा निलंबन समाप्त होते, त्यामुळे त्याला पुन्हा सेवेत घेणे बंधनकारक बनले आहे. त्यामुळे जे खरोखर कसुरवार आणि पदाचा गैरवापर करणारे अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांना या दिरंगाईचा फायदा होतो, ते पुन्हा ताठमानेने सेवेत रुजु होतात, त्यामुळे निलंबितांविरुद्धचे आरोपपत्र कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्धारित ९० दिवसाच्या आत सादर करण्याची सूचना सर्व शासकीय विभागांना तसेच एसीबीला करण्यात आलेली आहे.एसीबीची शेकडो प्रकरणे प्रलंबितगेल्या काही वर्षात एससीबीने लाचखोरावर कारवाईचा धडाका लावला असलातरी त्यांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात दिरंगाई झालेली आहे. शेकडो प्रकरणाची आरोपपत्रे तयार झालेली नाहीत, किंवा त्यांना विभाग प्रमुखांकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे निर्धारित मुदतीमध्ये कार्यवाही न झाल्याने अनेक लाचखोरांना पुन्हा सेवेत हजर करुन घेणे भाग पडत आहे.

आरोपपत्र मंजुरीसाठी शासन व सक्षम अधिकाऱ्यांकडील प्रलंबित प्रकरणे दिवसापेक्षा कमी ९० दिवसापेक्षा जास्त एकूण शासन सक्षम

टॅग्स :suspensionनिलंबनPoliceपोलिसcommissionerआयुक्तMaharashtraमहाराष्ट्र