शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

दहावी नापास टोळीचा देशभरात धुडगूस, ओएलएक्सवरून कोट्यवधी रुपयांची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 7:34 AM

सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सविता कदम, संदीप पाचांगणे यांच्यासह पोलिस नाईक सचिन सावंतसह २० जणांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

मुंबई : ओएलएक्सवरून जवान, पोलिस असल्याचे भासवून खरेदी करण्याच्या बहाण्याने महाराष्ट्रासह देशभरातील १९ राज्यांतील नागरिकांना राजस्थान, उत्तर प्रदेशमधून गंडविणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांच्या ‘स्पेशल २०’ टीमने पर्दाफाश केला. या टोळीच्या म्होरक्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीविरोधात राज्यासह भारतातून २७० तक्रारी समोर आल्या आहेत. सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सविता कदम, संदीप पाचांगणे यांच्यासह पोलिस नाईक सचिन सावंतसह २० जणांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पाच दिवस सुरू असलेल्या या ऑपरेशनअंतर्गत सायबर पोलिसांनी टोळीचा म्होरक्यांपैकी एक सर्वसुख खुट्टा रुजदार ऊर्फ समशू  (३७, भरतपूर) यांच्यासह तुलसीराम रोडुलाल मीणा (२५, जयपूर), अजित शिवराम पोसवाल (१९, भरतपूर), इरसाद सरदार (२४, मथुरा) या चौकडीला अटक केली आहे.  आरोपींकडून ९ मोबाइल फोन, ३२ विविध बँकांचे डेबिट कार्ड, चेकबुक, १   चेकबुक, ४ सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. तसेच ८३५ मोबाइल क्रमांक, ३८ आयएमईआय क्रमांक प्राप्त झाले असून त्याबाबतही अधिक तपास सुरू आहे. सुरतहून  मुंबईत बदली झालेल्या तक्रारदाराने फर्निचर विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. आरोपींनी खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे भासवून संपर्क साधला. पुढे, पैसे पाठविण्याच्या बहाण्याने क्यू आर कोड स्कॅन करण्यास सांगून अवघ्या दोन तासांत १२ व्यवहार त्यांच्या खात्यातील १७ लाख ८२ हजार रुपयांवर डल्ला मारला. हे प्रकरण सायबर पोलिसांकडे येताच तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पथकाने शोध सुरू केला. याच, तपासातून राजस्थान आणि उत्तर प्रदेशपर्यंतच्या या टोळीपर्यंत पथक पोहोचले. 

असे चालते काम... चार टप्प्यांमध्ये या टोळीचे कामकाज चालते. यामध्ये ओएलएएक्सवर नवीन येणाऱ्यावर लक्ष ठेवणारे, त्यांच्याशी बोलणारे, माहिती देणारे आणि पैसे काढणारे असे ग्रुप आहेत. प्रत्येक टप्प्यात कमिशनचे रेटदेखील ठरले आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी... नागरिकांनी ओएलएक्सवरून व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. या टोळीकडून जवान, पोलिस असल्याचे भासवून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत असल्याचे दिसून आले. कुठलीही खातरजमा केल्याशिवाय व्यवहार करू नका. फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधा. या टोळीविरोधात २६९ तक्रारी आल्या असून राज्यातील १४ तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. तसेच, तेलंगणामध्ये देखील ५०० हून अधिक तक्रारी असल्याची माहिती मिळत असून ते प्रकरणदेखील  तपासासाठी घेण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. - बालसिंग राजपूत, पोलिस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा, मुंबई

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी