शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

सुभाषसिंग ठाकुरच्या खास हस्तकाला गुन्हे शाखेच्या टीमने केली बिहार राज्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 9:31 PM

Crime News : सुभाषसिंगचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या अखिलेश उर्फ राजू तिवारी (५०) या आरोपीला अटक झाल्यानंतर गुन्हेगार विश्वात खळबळ माजली आहे.

नालासोपारा : विरारमध्ये गाजलेले समय चव्हाण हत्याकांडाशी लागेबंध आणि कुख्यात गँगस्टार सुभाषसिंग ठाकुरच्या खास हस्तकाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या टीमने बिहारच्या कटीहार जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातून पकडण्यात यश मिळाले आहे. सुभाषसिंगचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या अखिलेश उर्फ राजू तिवारी (५०) या आरोपीला अटक झाल्यानंतर गुन्हेगार विश्वात खळबळ माजली आहे. सध्या या आरोपीला मोक्याच्या गुन्ह्यात अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहे.

२६ फेब्रुवारीला दिवसाढवळ्या मनवेलपाडा येथील मुख्य रस्त्यावर गोळ्या घालून समय चौहान (३२) याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने १० आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपींची संघटीत टोळी मोडून काढण्यासाठी मुख्य आरोपी गॅंगस्टर सुभाषसिंग ठाकूरवर मोक्का अंतर्गत कारवाई करत दोषारोप पत्र वसई न्यायालयात दाखल केले होते. या हत्याकांडात राहुल शर्मा, अभिषेक सिंग, अर्जुन सिंग आणि मयत मनीष सिंग या शूटरांना समयच्या हत्येसाठी गुन्हा करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सूत्रांकडून कळते. सुभाषसिंग हा जेलमध्ये असल्यापासून ओळख असणाऱ्या अखिलेश याने एका गुन्ह्यात नऊ वर्षे शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आल्यावर सुभाषसिंगचे साम्राज्य सांभाळण्यासाठी सुरुवात केली. तेव्हापासून शूटर, खंडणी बाहेरील व्यवहार तोच सांभाळत होता पण कधीही कोणत्याही पोलिसांच्या हाती सापडला नाही.

समय चव्हाण याची हत्या झाल्यावर याचे नाव निष्पन्न झाले होते पण तो पोलिसांना सापडत नव्हता. तो त्याच्या मूळ यूपी राज्यात न राहता बिहार ते नेपाळ असे राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना मिळाली. तसेच तो बिहारच्या कटिहार जिह्यातील एका छोट्याशा गावात राहत असल्याची गुप्त माहिती युनिट तीनचे पोलीस पथकाला मिळल्यावर त्यांची टीम घेऊन त्याठिकाणी पोहचले. १४ जुलैला अखिलेश उर्फ राजू तिवारीला ताब्यात घेऊन ट्रान्झिट रिमांड घेऊन शनिवारी रात्री वसईत आणले. रविवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर आरोपीला १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी असल्याचे पोलीस निरीक्षक बडाख यांनी लोकमतला सांगितले. मिरा रोड येथील बंटी प्रधान या हत्येशी याचे काही सूत जुळते का याचा पोलीस शोध घेत आहे. 

कोण आहे अखिलेश उर्फ राजू तिवारी?

अखिलेश तिवारी हा पूर्वश्रमीचा यूपी पोलीस दलात होता. त्याच्या वादग्रस्त भूमिकेमुळे २ वेळा बरखास्त आणि ३ वेळा निलंबित होता. एका मोठ्या व्यापाऱ्याच्या अपहरण गुन्ह्यात त्याला अटक केल्यानंतर साबरमती जेलमध्ये ९ वर्षे सजा भोगली आहे. त्याचवेळी जेलमध्ये सुभाषसिंग ठाकूर याची ओळख झाली. जेलमधून सुटल्यावर त्याने सुभाषसिंग याचे साम्राज्य सांभाळण्यास सुरुवात केली. सुभाषसिंगच्या गुन्हेगारी जगताशी सर्व घडामोडींवर तो लक्ष्य ठेवून त्याला चालना देत होता.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसBiharबिहारjailतुरुंगVirarविरार