शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

भरधाव टेम्पोने दुचाकीला उडविले; चार जण जागीच ठार

By राजकुमार जोंधळे | Published: March 04, 2023 5:20 AM

जोडजवळा परिसरात रात्री घडली घटना

लातूर : कळंबकडून लातूरच्या दिशेने शिमला मिरची घेऊन निघालेल्या भरधाव पिकअप टॅम्पोने दुचाकीला उडविले. या अपघातात दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना लातूर तालुक्यातील जोडजवळा परिसरात शुक्रवारी रात्री घडली.

पोलिसांनी सांगितले, लातूरकडून कळंबच्या दिशेने दुचाकीवर चारजण शुक्रवारी रात्री जात होते. दरम्यान, कळंबकडून शिमला मिरची घेऊन लातूरच्या दिशेने पिकअप टेम्पो भरधाव येत होता. जाेडजवळा गावानजीक आल्यानंतर एका धाब्यानजीक भरधाव पिकअप टेम्पोने दुचाकीला जोराने उडविले. या भीषण अपघातात दुचाकीवरील चारजण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी गातेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक खोत यांच्यासह पोलिसांनी भेट दिली. अपघातातील मयत चौघांना लातूरच्या शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. रात्री उशीरापर्यंत दुचाकीवरील मयत चार जणांची नावे हाती आली नाहीत. टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये दुचाकीवरील चारही जण रस्त्यालगत फेकले गेले. यामध्येच ते ठार झाल्याची माहिती गातेगाव ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक किशोर कांबळे यांनी दिली.

रात्रीच्या काळोखात घडला भीषण अपघात...

रात्रीची वेळ आणि सर्वत्र काळोख पसरला होता. दरम्यान, लातूरकडून निधालेल्या दुचाकीला कळंब कडून येणाऱ्या भरधाव टेम्पोने जोराने उडविले. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील चारजण ठार झाल्याची माहिती गातेगाव पोलिसांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात