शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

‘आज मारोगे तो कल मारे जाओगे’ म्हणत गरब्यात धुडगूस; इन्स्टावर पोस्ट टाकत तरुणांकडून धमकी

By प्रदीप भाकरे | Published: October 07, 2022 10:49 PM

अर्जुननगरातील श्री जयदुर्गा उत्सव मंडळाने नवरात्रोत्सवादरम्यान गरबा आयोजित केला होता.

अमरावती : इन्स्टाग्रामवर ‘मौका सभी को मिलता है, आज मारोगे तो कल मारे जाओगे’ व लवकर भेटू अर्जुननगरवालो’ अशी पोस्ट शेअर करून डझनभर तरुणाईने नंग्या तलवारी हवेत भिरकावत गरबास्थळी धुडगूस घातला. विशेष म्हणजे त्यापैकी चार ते पाच मुले ही अल्पवयीन आहेत. स्थानिकांनी एकजुटीने तो हल्ल्याचा प्रयत्न परतवून लावला. गाडगेनगर पोलिसांनी चार ते पाच तरुणांना ताब्यात घेतले. अर्जुननगरात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

अर्जुननगरातील श्री जयदुर्गा उत्सव मंडळाने नवरात्रोत्सवादरम्यान गरबा आयोजित केला होता. शुक्रवारी ज्या मुलांनी गरबा मंडपात धुडगूस घातला. त्यापैकी काही तरुण चार- पाच दिवसांपूर्वी त्या गरब्यात सहभागी झाले होते. मात्र, ते गरब्यादरम्यान मुलींची छेड काढत असल्याच्या तक्रारी काहींनी केल्या. मंडळ कार्यकत्यांनी आधार कार्ड तपासले असता ते अर्जुननगर परिसरातील रहिवासी आढळून आले नाहीत. त्यामुळे गरबा आयोजकांनी त्यांना मज्जाव करत तेथून हाकलून दिले. त्यावेळी तूतू- मैमैदेखील झाली. त्याचा वचपा काढण्यासाठी ‘बॅडबॉय’ असे अकाउंट असलेल्या एकाने इन्स्टाग्रामवर अर्जुननगरवासियांना धमकी देणारी पोस्ट टाकली.

सायकल फेकल्याने लागली चाहूल

ज्यांना गरबा मंडपातून हाकलून देण्यात आले, ते दहा ते बाराजण शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अर्जुननगरात पोहोचले. तेथे त्यांनी एका मुलाची सायकल हिसकावून ती फेकून दिली. शुक्रवारी तेथे भंडारा असल्याने मंडळाचे अनेक कार्यकर्ते हजर होते. त्यांना त्याच तरुणांनी सायकल फेकल्याचे समजताच मंडळाचे अध्यक्ष मनीष बोडखे यांना घटनेची चाहूल लागली. त्यांनी ११२ वर कॉल करून माहिती दिली. दरम्यान, १० ते १२ जण हाती तलवारी घेऊन गरबास्थळी पोहोचले. तेथे त्यांनी मंडळाच्या कार्यकत्यांशी प्रचंड वाद घातला. थोडी मारामारीदेखील झाली. दरम्यान, एसीपी पुनम पाटील व ठाणेदार आसाराम चोरमले तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले. तर सात ते आठ जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या.

टॅग्स :AmravatiअमरावतीNavratriनवरात्री