शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
3
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
4
Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
5
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
6
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
7
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
8
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
9
रतन टाटांचा दशकांचा असा एक मित्र, ज्याच्याशी मैत्री तुटली ती शेवटपर्यंत तुटलेलीच राहिली...
10
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
11
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
12
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
13
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
14
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
15
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व
16
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
17
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
18
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
19
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
20
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

१४ वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2023 4:36 PM

१५ सप्टेंबर २०१० साली खैरपाडा येथील ताई पाटील चाळीत राहणाऱ्या पांधारी शामु राजभर (२५) याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. 

- मंगेश कराळे

नालासोपारा : १४ वर्षापासून हत्या करून फरार असलेल्या मुख्य आरोपीला माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी मुंबईच्या अंधेरी येथून सोमवारी अटक केली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास करत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी मंगळवारी दिली आहे. १५ सप्टेंबर २०१० साली खैरपाडा येथील ताई पाटील चाळीत राहणाऱ्या पांधारी शामु राजभर (२५) याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. 

आरोपीने त्याचे दोन्ही हात बांधुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत टाकुन दिले होते. त्यावेळी माणिकपूर पोलिसांनी हत्या, हत्येचा पुरावा नष्ट करणे या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांनी पोलीस ठाण्याला दाखल गुन्हयातील अभिलेखावरील पाहिजे व फरारी आरोपी यांची विशेष शोध मोहीम राबवुन त्यांच्या ठावठिकाणांबाबत माहिती घेवून त्यांना गुन्हयात अटक करण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले होते.

सदर सूचना व मार्गदर्शनांप्रमाणे माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांञिक विश्लेषणाद्वारे व गुप्त बातमीदारांकडुन प्राप्त माहीतीचे आधारे फरार आरोपी नामे संजय गामा भारव्दाज (३९) याला अंधेरी येथुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता मयत इसमाने आरोपीस ५ हजार रुपये ऍडव्हान्स न दिल्याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या साथीदारांसह त्याला कारमध्ये बसवुन रुमालाने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर रुमालाने मयताचे हात पाठीमागे बांधुन त्यास मौजे ससुनवघर गावचे हद्दीत, मुंबई अहमदाबाद महामार्गावर मातीच्या ढिगा­ऱ्याजवळ फेकून दिले होते. तो मागील १४ वर्षापासुन बनारस, उत्तरप्रदेश व अंधेरी येथे आपले अस्तित्व लपवुन राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजीत मडके, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार शैलेश पाटिल, धनंजय चौधरी, शामेश चंदनशिवे, अनिल चव्हाण व प्रविण कांदे यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी