शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

४ मुलांच्या आईनं दोघांवर जीव लावला; लग्नाच्या १० दिवसापूर्वी एकाला संपवला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 19:04 IST

बिटोलाची पती दिल्लीत दगड कापण्याचे काम करतो. अर्जुन त्याच्याकडे नोकरी करायचा. बिटोलाचे गावातील मुन्नासोबत संबंध होते. याचवेळी बिटोला अर्जुनच्याही प्रेमात पडली

बांदा - उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात प्रेम प्रकरणात एका महिलेने कथित प्रियकरासोबत मिळून दुसऱ्या प्रियकराची कुऱ्हाडीनं हत्या केली आहे. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. घटनास्थळी कुऱ्हाड आणि मृतकाचा मोबाईल सापडला आहे. या घटनेतील महिला ही ४ मुलांची आई असून तिला २ मुले आणि २ मुली आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार, दुर्गापूर येथील अर्जुन उर्फ छोटे हा घरापासून १०० मीटर अंतरावरील एका गोठ्यात रविवारी झोपण्यासाठी गेला होता. सोमवारी सकाळी मोठा भाऊ जनावरांना चारा देण्यासाठी गोठ्यात पोहचला तेव्हा अर्जुन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आले. त्याच्या गळ्यावर आणि शरीरावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले होते. स्थानिकांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. 

मोठ्या भावाने सांगितले की, रात्री अर्जुनला फोन आला होता. गावातील बिटोला यादव आणि मुन्ना पांडे दरवाजा उघडण्यासाठी सांगत होते. मी दरवाजा उघडू नको असं सांगत त्यांना सकाळी भेटा असा निरोप द्यायला सांगितला. परंतु अर्जुननं ऐकलं नाही. तो घराबाहेर पडला. मुन्ना आणि बिटोला यांनी मिळून अर्जुनची हत्या केलीय असा आरोप करत भावाने मुन्ना पांडेय आणि बिटोला यादव यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला. 

बिटोलाची पती दिल्लीत दगड कापण्याचे काम करतो. अर्जुन त्याच्याकडे नोकरी करायचा. बिटोलाचे गावातील मुन्नासोबत संबंध होते. याचवेळी बिटोला अर्जुनच्याही प्रेमात पडली. तो कधीही गावात यायचा तेव्हा बिटोलाला भेटायला जायचा. मुन्नाला या दोघांच्या प्रेम प्रकरणाची माहिती पडली. तेव्हा त्याने बिटोलाला सोबत घेऊन अर्जुनचा काटा काढण्याचा ठरवले. त्या दोघांनी मिळून अर्जुनची हत्या केली. प्रथम दर्शनी हे हत्याचे प्रकरण वाटत असून पोलीस तपास करत आहेत अशी माहिती एएसपीने दिली. 

दिल्लीहून १५ दिवसांसाठी आला, २० तारखेला होतं लग्न अर्जुन दिल्लीला काम करायचा. १५ दिवसांपूर्वी तो दिल्लीहून आला होता. त्याचे २० फेब्रुवारीला लग्न होते. घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र लग्नाच्या आधीच अर्जुनच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ज्या घरातून वरात निघणार होते तिथेच अर्जुनची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली. अर्जुन नेहमी लाला यादवकडून बिटोलासाठी पाठवलेले सामान दिल्लीहून घेऊन यायचा. त्यामुळे बिटोलासोबत अर्जुनची जवळीक वाढली. याचाच बदला घेण्यासाठी बिटोला प्रियकर मुन्ना पांडेयने महिलेसोबत मिळून अर्जुनची कुऱ्हाडीने हत्या केली.