शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

एल्गार परिषदेप्रकरणी एका तरुणीसह तिघांना पुण्यातून अटक; एनआयएची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 1:15 AM

माओवादी संघटनेशी संबंधित असल्याचा दावा

मुंबई : पावणेतीन वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी रात्री पुण्यातून एका तरुणीसह तिघा परिवर्तनवादी चळवळीतील तरुणांना अटक केली.

सागर तात्याराम गोरखे (वय ३२, रा. वाकड), रमेश मुरलीधर गायचोर (वय ३६, रा. येरवडा) व ज्योती राघोबा जगताप (वय ३३, रा. कोंढवा) अशी त्यांची नावे असून सर्व जण कबीर कला मंचचे सदस्य आहेत. त्यांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा तपास यंत्रणेचा आरोप असून या सर्वा$ं$ना शुक्रवारपर्यंत एनआयए कोठडी मिळाली आहे.

पुण्यात शनिवारवाड्यासमोर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कबीर कला मंचच्या वतीने एल्गार परिषद झालेली होती. त्या वेळी झालेल्या चिथावणीखोर भाषणामुळे १ जानेवारीला भीमा-कोरेगाव येथे दंगल झाली. या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पुणे पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर केंद्राने सात महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांकडून हा तपास एनआयएकडे वर्ग केला.

त्यानंतर या प्रकरणात फरारी असलेल्या डाव्या कट्टर विचारसरणीच्या नेत्यांनी कला मंच व इतर समविचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांना भीमा-कोरेगाव येथील रस्ते आणि अन्य बाबीबद्दल माहिती पुरविली होती. त्याचप्रमाणे कला मंचच्या सदस्यांनी नक्षलवादी संघटनांशी हातमिळवणी करून शस्त्रे, स्फोटक चालविण्याबाबत प्रशिक्षण घेतले आहे. त्यानुसार एनआयएच्या पथकाने सोमवारी पुण्यात छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले. सर्वांना मंगळवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.  

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक