शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खवल्या मांजराची खवलं विक्रीसाठी आलेल्या तिघांना भाईंदरमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 21:44 IST

साडे पाच किलो वजनाच्या या खवलांची आतंरराष्ट्रीय बाजारात सुमारे २२ लाख रु पये इतकी किंमत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीवरून भाईंदर येथे आलेल्या तिघाजणांना नवघर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. आरोपींनी खवलं कुठून आणली आणि कोणास  विक्रीसाठी आणली याचा तपास पोलीस करत आहेत.

मीरारोड - वन्यजीवातील संरिक्षत आणि अतिदुर्मिळ असलेल्या खवल्या मांजराची खवलं विकण्यासाठी रत्नागिरीवरून भाईंदर येथे आलेल्या तिघाजणांना नवघर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. साडे पाच किलो वजनाच्या या खवलांची आतंरराष्ट्रीय बाजारात सुमारे २२ लाख रु पये इतकी किंमत आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक टिकाराम थाटकर यांना रामदेव पार्क येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे मंडई जवळ खवल्या मांजराची खवलं विकण्यासाठी रत्नागिरीवरून काही तस्कर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने थाटकर यांच्यासह रविंद्र भलेराव, नवनाथ माने, नीलेश शिंदे, नितेश पाटील, चेतन राजपूत व आकाश वाकडे यांच्या पथकाने सापळा रचला होता.सायंकाळी सहाच्या सुमारास एका गाडीने तिघे जण आले असता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साडेपाच किलो खवलं सापडली असून त्याची बाजारात सुमारे २२ लाख इतकी किंमत आहे. या प्रकरणी सतीश बिहरे (५१),सचिन ढोले (३८) व नीलेश उधे (३८) या तिघांना वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे . तिघेही रत्नागिरीचे राहणारे आहेत. आरोपींनी खवलं कुठून आणली आणि कोणास  विक्रीसाठी आणली याचा तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRatnagiriरत्नागिरीbhayandarभाइंदर