शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

चोरांचा कारनामा! 7 क्विंटल कांद्यानंतर आता 25 किलो टोमॅटोंवर मारला डल्ला; व्यापारी म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 11:23 IST

एका व्यापाऱ्याचा सात क्विंटल कांदा चोरीला गेला होता. आता काल रात्री चोरट्यांनी एक कॅरेट टोमॅटो, बटाट्याचं पोतं इतर साहित्य चोरून नेले.

भाजीपाला सातत्याने महाग होत आहे. अशा स्थितीत भाजी चोरीच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हरदोई येथील बाजारात एका व्यापाऱ्याचा सात क्विंटल कांदा चोरीला गेला होता. आता काल रात्री चोरट्यांनी एक कॅरेट टोमॅटो, बटाट्याचं पोतं इतर साहित्य चोरून नेले. या घटनेनंतर बाजारपेठेत एकच खळबळ उडाली असून सर्वत्र या घटनेची चर्चा रंगली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली शहर परिसरात लखनौ रोडवर बांधलेल्या नवीन बाजारपेठेत घाऊक भाजीचा व्यापार केला जातो. शहर परिसरातील भाजी मंडई व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर बाजारपेठेतील व्यापारीही येथून भाजी खरेदी करतात. दोनच दिवसांपूर्वी चोरट्यांनी एका व्यापाऱ्याचा सात क्विंटल कांदा चोरून नेला होता. काल रात्री चोरट्यांनी एका एजंटचे सुमारे 25 किलो टोमॅटो भरलेलं कॅरेट, बटाट्याची पोती व इलेक्ट्रॉनिक काटा व इतर साहित्य चोरून नेले. 

सकाळी मालक राजाराम यांनी पाहिलं असता त्यांना या चोरीच्या घटनेची माहिती मिळाली. सुमारे बारा हजार किमतीचा भाजीपाला व इतर माल चोरट्यांनी चोरून नेल्याचे राजाराम यांनी सांगितले. सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. काही ठिकाणी 120 ते 130 रुपयांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. तरा काही ठिकाणी 150 रुपये प्रति किलोपर्यंत होत आहे. 

सकाळी दहापर्यंत हा बाजार सुरू राहतो आणि नंतर बंद होतो. त्यामुळे ते टोमॅटो तिथेच ठेवतात. व्यापऱ्यांनी आम्ही टॅक्स देत असल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यानंतरही बाजार प्रशासन सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करत नाही. त्यामुळे रोजच चोरीच्या घटना घडत आहेत. आता व्यापारी स्वतः मालाची काळजी घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी