शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ठाण्यात तिहेरी हत्याकांड! दीरासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची हत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: December 21, 2023 19:26 IST

गुरुवारी सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झाला आहे.

ठाणे: दीराशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नी भावना अमित बागडी (२४), सहा वर्षीय मुलगी खुशी आणि आठ वर्षीय मुलगा अंकुश या तिघांची लाकडी बॅटच्या सहाय्याने अमित धर्मवीर बागडी (२९) या पतीने निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पाच पथके नेमल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

आरोपी अमित आणि त्याची पत्नी भावना यांचे आठ वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे. ते मुळचे हरयाणा राज्यातील खरडालीपूर (जि. इसार) येथील रहिवाशी आहेत. अमितला दारुचे प्रचंड व्यसन असल्यामुळे भावना त्याला सोडून ठाण्यातील कासारवडवली जयवंत शिंदे यांच्या चाळीत राहणारा त्याचाच सख्खा लहान भाऊ (तिचा दीर) विकास धर्मवीर बागडी याच्यासोबत गेल्या सात वर्षांपासून मुलांसह राहत होती. 

अमित कधीतरी पत्नी आणि दोन्ही मुलांना भेटण्यासाठी ठाण्यात यायचा. तसाच तो तीन दिवसांपासून ठाण्यात आला होता. मुलांना भेटण्याच्याच निमित्ताने तो भावाच्याच घरात मुले आणि पत्नीसोबत वास्तव्याला होता. नेहमीप्रमाणे त्याचा भाऊ विकास हा त्याच्या हाऊसकिपिंगच्या कामासाठी गुरुवारी (२१ डिसेंबर रोजी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. 

सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा त्याला घरात भावजय भावना तसेच दोन मुले ही रक्ताच्या थारोळयात मृतावस्थेत आढळली. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची लाकडी बॅटही होती. त्याने ही माहिती तातडीने त्याचे घरमालक जयवंत शिंदे (५०) यांना दिली. शिंदे यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, कासारवडवलीचे पोलिस निरीक्षक शशिकांत रोकडे, सहायक पोलिस निरीक्षक सुहास हटेकर आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपीने मात्र तोपर्यंत तिथून पळ काढला होता.

पती-पत्नींमध्ये वादअमितचा भाऊ विकास सकाळी घराबाहेर पडल्यानंतर पती आणि पत्नींमध्ये वाद झाल्याची शक्यता आहे. पत्नी आपल्या भावाकडे वास्तव्याला असल्याची सल त्याच्या मनात होती. तर पतीच्या दारुच्या व्यसनाला पत्नी त्रासली होती. यातूनच त्यांच्यात वाद होऊन त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. मात्र, हत्याकांडाचे नेमके कारण स्पष्ट नसल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठिवण्यात आले आहेत.

आरोपीच्या शोधासाठी चार पथकेआरोपी अमित हा मुळचा हरियाणाचा असल्यामुळे बोरीवली, ठाणे येथील रेल्वे स्थानक त्याचबरोबर अन्यत्र शोधासाठी कासारवडवलीची दोन, चितळसरचे एक तसेच गुन्हे शाखेचे एक अशी चार पथके तैनात केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. तिचे धाकट्या भावाबरोबर राहणे हे अमितला पटत नव्हते, त्यांच्यातील अनैतिक संबंधाचा त्याला संशय असण्याची तसेच अन्यही कारणातून ही हत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोपीचा भाऊ विकास याच्यासह त्याच्या अन्य नातलगांकडेही याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे