शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अनिश्चिततेचे सावट, अद्याप ठोस निर्णय नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 17:26 IST

दरवर्षी जून अखेरपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. त्या अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या बदल्या केल्या जातात.

ठळक मुद्देनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संबंधाने बोलताना १५ ऑगस्टच्या आत बदल्या होईल असे सांगितले. अनेक पोलिस अधिकारी ती खासगीत बोलूनही दाखवत आहेत. शीर्षस्थ पोलिस अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनुसार, १ ऑगस्ट पासून बदल्यांची यादी तयार झाली आहे.

नरेश डोंगरे

नागपूर : राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. तो कधी होणार, तेदेखील स्पष्ट नाही. त्यामुळे बदलीची आस लावून बसलेल्या अधिकाऱ्यांमधील अस्वस्थता तीव्र झाली आहे.

दरवर्षी जून अखेरपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. त्या अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून या बदल्या केल्या जातात. यावर्षी मात्र कोरोनाने सर्वच विस्कळीत करून टाकले. त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही विषय मागे पडला. दरम्यान, लॉक डाउन शिथिल करण्यात आल्यानंतर जुलै महिन्यात बदल्यांचे वारे वाहू लागले. 'बिगिनिंग अगेन'मुळे  हे वारे आणखीच गतिमान झाले. मात्र  बदलीच्या निर्णयाच्या संबंधाने रोजचा दिवस सारखाच निघत असल्याने  बदलीसाठी उत्सुक असलेल्या आयपीएस अधिकार्‍यांमध्ये  तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अनेक पोलिस अधिकारी ती खासगीत बोलूनही दाखवत आहेत. शीर्षस्थ पोलिस अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनुसार, १ ऑगस्ट पासून बदल्यांची यादी तयार झाली आहे. मात्र, एकमत न झाल्यामुळे ती तशीच पडून आहे. प्रारंभी अयोध्येतील राम जन्मभूमि पूजनाचा सोहळा झाल्यानंतर यादी निश्चित करून बदल्या जाहीर करण्याचे ठरले होते. त्यामुळे ६ ऑगस्ट पासून बदलीच्या तयारीत असलेल्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी आपली तयारी करून ठेवली आहे. आज होणार, उद्या बदली होणार, असे निरोप मिळत असल्याने अनेक जण फोनोफ्रेंड करून एकमेकांकडे विचारणा करीत आहेत. अनेक शिर्षस्थ अधिकारी आपल्या सहकाऱ्यांना दिलासा देत आहेत. मात्र, शनिवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संबंधाने बोलताना १५ ऑगस्टच्या आत बदल्या होईल असे सांगितले. हे सांगताना सगळा विचार विमर्श करून बदलिबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगून अद्याप आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत काही निश्चित झाले नाही, असेही संकेत दिले आहे.बंदोबस्ताचे काय ?१५ ऑगस्टचा बंदोबस्त आणि नंतर सुरू होणारा गणेशोत्सव बंदोबस्त बदली झालेल्या नव्या अधिकाऱ्यांना सूट होईल का, अशी शंका घेतल्यामुळे त्यांनी यावर काही बोलण्याचे टाळले. यावरून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत अजुनही अनिश्चितता असल्याचे स्पष्ट झाले आहे. किमान एक आठवडा तरी बदल्या होणार नाही, असेही आता वरिष्ठ पोलीस अधिकारी बोलू लागले आहेत.नागपुरातील पाच अधिकारी बदलणारबदलीची यादी जाहीर आल्यास कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या मुद्द्यावर नागपुरातील पोलीस आयुक्तांसह किमान पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात. दुसरीकडे शहरातील क्राईम रेट कमी केल्यामुळे पोलीस आयुक्तांना आणखी काही महिने येथेच ठेवले जाऊ शकते, असेही मत काही अधिकारी मांडत आहेत. 

बदल्याबाबतची पूर्व प्रक्रिया झाली आहे. थोडी फार जी आहे, त्यावर निर्णय घेऊन लवकरच बदल्या केल्या जातील. - अनिल देशमुख, गृहमंत्री

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

लज्जास्पद! मुलांसमोरच  'टॉपलेस' होऊन अर्धनग्न शरीरावर पेंटिंग काढून घेणं पडलं महागात, रेहाना फातिमा सरेंडर

 

६ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केले लैंगिक शोषण, ४ दिवसांनंतरही आरोपी फरार

 

दुर्दैवी अंत! लाकडाच्या ढिगाऱ्यावर कुत्रा चढल्याने दोन मुलींचा मृत्यू                

टॅग्स :PoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखHome Ministryगृह मंत्रालयnagpurनागपूर