शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

'उंदीर हत्या' प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर ट्विस्ट...; हत्या नाही, आधीपासूनच फुफ्फुस-लिव्हर होतं खराब 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 12:16 PM

आयव्हीआरआयचे ज्वॉइंट डायरेक्टर डॉक्टर केपी सिंह यांनी म्हटले आहे, की देशात उंदराचे पोस्टमॉर्टम होण्याची ही पहिलीच वेळ...

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्यात उंदीर हत्या प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर, नवा खुलासा झाला आहे. बरेलीच्या आयव्हीआरआयमध्ये वैज्ञानिकांनी उंदराचे पोस्टमॉर्टम केले. यात, उंदराचा मृत्यू नाल्याच्या पाण्यात बुडून नाही, तर गुदमरल्यामुळे झाला आहे. उंदराचे फुफ्फूस आणि लिव्हर आधीपासूनच अत्यंत खराब होते. यामुळे, उंदीर अधिक काळ जगणे अशक्य होते. असेही यात सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सदर पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या कल्याणनगर भागातील पशू मित्र विकेंद्र शर्मा हे 25 नोव्हेंबरच्या दुपारी बदायूंच्या गांधी मैदान चौकाजवळून जात होते. यावेळी त्यांना मनोज कुमार नावाचा एक युवक उंदराच्या शेपटीला दगड बांधून, त्याला नाल्यात बुडवताना दिसला. हे पाहताच त्यांनी तत्काळ नाल्यात उडी मारून उंदराला वाचवले. मात्र, तोवर त्या उंदराचा मृत्यू झाला होता. यानंतर, विकेंद्रने या प्रकरणाची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात केली.

यानंतर पोलिसांनी मृत उंदराला सील केले आणि बदायूंतील पशू वैद्यकीय रुग्णालयात पाठवले. मात्र, तेथील स्टाफने संसाधनांच्या कमतरतेमुळे पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला. यावर, फिर्यादीच्या अर्जानंतर, पोलिसांनी उंदराचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बरेली येथील आयव्हीआरआयमध्ये पाठवला आहे. आयव्हीआरआयचे ज्वॉइंट डायरेक्टर डॉक्टर केपी सिंह यांनी म्हटले आहे, की देशात उंदराचे पोस्टमॉर्टम होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

केपी सिंह म्हणाले, पोस्टमॉर्टमनंतर उंदराच्या इतर अवयवांची माइक्रोस्कोपच्या सहाय्याने तपासणी करण्यात आली. पॅथॉलॉजिस्ट डॉ.अशोक कुमार आणि डॉ.पवन कुमार यांनी उंदराचे शवविच्छेदन केले. यात, नाल्यातील पाण्यातील घाणीचे अवशेष फुफ्फुसात आढळले नाहीत. उंदराचा मृत्यू गुदमरून झाला नाही. उंदराचे फुफ्फुस आणि लिव्हर आधीच खराब झाले होते आणि उंदराला अनेक आजार होते. यामुळे तो वाचण्याची शक्यता फारच कमी होती, असे आढळून आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार