शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

भयंकर! 3 मुलांची आई पतीला सोडून पळून गेली, 20 वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत राहिली अन् आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 17:13 IST

तीन मुलांची आईने 20 वर्षे लहान बॉयफ्रेंडसाठी आपल्या पतीला सोडलं त्यानंतर ती त्याच्यासोबत पळून गेली. मात्र आता एक भयंकर घटना समोर आली आहे.

तीन मुलांच्या आईने 20 वर्षे लहान बॉयफ्रेंडसाठी आपल्या पतीला सोडलं त्यानंतर ती त्याच्यासोबत पळून गेली. मात्र आता एक भयंकर घटना समोर आली आहे. नाल्यामध्ये या महिलेचा मृतदेह सापडला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मीना अहिरवार ही महिला 50 वर्षांची होती. तिला तीन मुलं आहेत. ती पती उत्तम आणि मुलांना सोडून बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. त्यानंतर ती त्याच्याच सोबत राहू लागली. 

मीनाच्या बॉयफ्रेंडचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला. अशा परिस्थितीत मीना एकटी पडली.त्यानंतर ती तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या दुसऱ्या बॉयफ्रेंडसोबत राहू लागली. त्याच्यामध्ये आणि मीनामध्ये खूप भांडणं व्हायची. मीना गैरकृत्यांमध्ये सहभागी असल्याचेही म्हटले जात आहे. याच दरम्यान 11 फेब्रुवारी रोजी प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नाल्यात मीनाचा मृतदेह पोत्यात सापडल्याने खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पालकांनी मीनाचं लग्न ललितपूर जिल्ह्यातील महरौनी येथील उत्तम याच्याशी करून दिलं होतं. तिला अभिषेक, संगीता आणि लखन ही तीन मुलं आहेत. तिन्ही मुलं विवाहित आहेत. याच दरम्यान मीना महरौनी येथे राहणाऱ्या राजकुमाराच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती तीन मुलं आणि पती उत्तमला सोडून राजकुमारसोबत पळून गेली. पण कोरोनाच्या काळात तिचा प्रियकर राजकुमारचा मृत्यू झाला. 

राजकुमारच्या मृत्यूनंतर मीना एकटी पडली. मधल्या काळात तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या मुलाशी तिची मैत्री झाली. ती त्याच्यासोबत राहत होती. मीनाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितलं की, रोज ती कामावर जात असल्याचं सांगून घरातून निघून जायची. पण ती कोणतं काम करायची हे कोणालाच माहीत नाही. शुक्रवारीही ती कामावर जात असल्याचं सांगून घरातून निघून गेली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी