शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बापरे! "माझ्या बायकोने केलीत ७-८ लग्न"; नवऱ्याने पोलखोल करताच चिडली, फेकलं उकळतं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:25 IST

सूरज नावाच्या एका व्यक्तीने त्याची पत्नी ज्योतीवर गंभीर आरोप केले आहेत.

दिल्लीत सूरज नावाच्या एका व्यक्तीने त्याची पत्नी ज्योतीवर गंभीर आरोप केले आहेत. ज्योतीने त्याला आणि त्याच्या तीन महिन्यांच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. तिने आतापर्यंत ७-८ वेळा लग्न केलं आहे आणि सासरच्या लोकांवर खोटा बलात्काराचे गुन्हा दाखल करते असं म्हटलं आहे. तसेच सूरजने लग्नानंतर ज्योतीने त्याचा मानसिक छळ केला आणि त्याला कुटुंबापासून पूर्णपणे तोडलं असंही सांगितलं.

सूरजने दिलेल्या माहितीनुसार, "लग्नानंतर ज्योती सतत माझा छळ करायची, मला मानसिक त्रास द्यायची आणि मला माझ्या कुटुंबाशी बोलू देत नव्हती. तिने माझी सर्व नाती तोडली. तर मला ज्योतीबद्दल धक्कादायक सत्य कळलं. मला समजलं की, तिने माझ्यापासून तिचं यापूर्वी सात-आठ वेळा लग्न झालं होतं हे लपवलं होतं."

सूरजचा आरोप आहे की, ज्योती लोकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि नंतर काही महिन्यांतच त्यांच्याशी लग्न करते. यानंतर ती तिच्या पतीला त्रास देते जेणेकरून तो तिला सोडून जाईल. ती लोकांकडून पैसे उकळते. ज्योतीने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. "मी झोपलो होतो. तेव्हा संतापलेल्या ज्योतीने एक बादली उकळतं पाणी, त्यात तिखट आणि मीठ टाकलं होतं आणि ते माझ्यावर फेकलं. माझा फोन हिसकावून घेतला, बाहेरून दरवाजा बंद केला आणि पळून गेली." 

"मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहिलो. दार बाहेरून बंद होतं. मी ते उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते उघडलं नाही. माझी मुलगीही तिथे होती आणि आवाजामुळे ती जोरजोरात रडू लागली. मी मदतीसाठी ओरडलो, मदत करा! मदत करा! पण कोणीही ऐकलं नाही. नंतर एक खिडकी दिसली, ती तोडली आणि कसा तरी बाहेर आलो आणि मदत मागितली" असं सूरजने म्हटलं आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीmarriageलग्न