शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर आई अन् मुलीनं स्वत:ला पेटवून घेतलं; विरोधकांनी योगी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 11:11 IST

अमेठीतील जमाई येथे राहणारी पीडित महिला गुडियाने तिच्या मुलीसह लोकभवन कार्यालयाच्या बाहेर अचानक स्वत:ला पेटवून घेतलं. यामुळे महिला ८० टक्के तर मुलगी ४० टक्के भाजली आहे.

ठळक मुद्देएका नाल्याच्या वादातून गुंडांकडून महिलेला मारहाण प्रकरणाची कोणतीही दखल न घेतल्याने महिला आणि तिच्या मुलीने पेटवून घेतले. सध्या दोघींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु, आईची प्रकृती गंभीर

लखनऊ – अमेठी जिल्ह्यातील एक महिला आणि तिच्या मुलीने शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या गेटजवळ आत्महत्येचा प्रयत्न केला. या दोघींना सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अनेकदा पोलीस कार्यालयाबाहेर चक्करा घातल्या पण कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्याने अखेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा महिलेचा आरोप आहे.

माहितीनुसार, अमेठीतील जमाई येथे राहणारी पीडित महिला गुडियाने तिच्या मुलीसह लोकभवन कार्यालयाच्या बाहेर अचानक स्वत:ला पेटवून घेतलं. यामुळे महिला ८० टक्के तर मुलगी ४० टक्के भाजली आहे. सध्या या महिलेची स्थिती गंभीर आहे. अमेठीत एका नाल्याच्या विवादातून काही लोकांनी महिलेला जबरदस्ती मारहाण केली होती. पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यानंतरही त्या लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर त्यांना मारहाण केली. तसेच पीडित महिलेला अपघात करुन तिचं खोटं नाव टाकू अशी धमकीही दिली. या प्रकरणावर सुनावणी होत नसल्याने महिला आणि तिच्या मुलीने शुक्रवारी लखनऊ येथे पोहचून मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीसाठी पोहचली.

मागील एक महिन्यापासून आई आणि मुलगी फेऱ्या घालत आहेत. त्यांची मंत्र्याची भेट झाली पण दोघींनीही लोकभवनच्या बाहेर येऊन स्वत:पेटवून घेतले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या दोन्ही महिलांवर उपचार सुरु आहेत. पीडित महिला गुडियाने सांगितले की, आमच्या येथील नाल्याची तक्रार ऐकून घेतली जात नाही. आम्ही अनेकदा तक्रार केली. त्यानंतर सुनावणी होत नव्हती. काही गुंड आम्हाला धमक्या देऊ लागले. त्यांनी आम्हाला मारहाणही केली. असे असूनही कारवाई झाली नाही असा आरोप तिने केला.

याबाबत एडिशनल डीसीपी चिरंजीव सिन्हा यांनी सांगितले की, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही महिलांना तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीनं वाचवलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हजरतगंज पोलीसही या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर पोहचले होते. मात्र या प्रकरणावरुन आता माजी मुख्यमंत्र्यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

अखिलेश यादव यांनी ट्विट केलं आहे की, लखनऊमध्ये लोकभवनसमोर दोन महिलांनी गुंडाविरोधात कारवाई होत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, हा प्रकार दुर्दैवी आहे. समाजवादी पक्षाने लोकभवन यासाठी बनवलं होतं कारण कोणत्याही भेदभावाशिवाय लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातील. गरिबांच्या समस्या सोडवल्या जातील. मात्र भाजपा सरकारमध्ये गरीबांचे कोणीही ऐकत नाही असा आरोप त्यांनी केला.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

…तर राज्याच्या आरोग्य यंत्रणेला आणखी काय हवं?; देवेंद्र फडणवीसांचं शिवसेनेकडून तोंडभरुन कौतुक

लेहसोबत आता समुद्रात भारताने दाखवली ताकद; चीनला दिला इशारा

 कोरोनावरील आणखी एक लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात; वैज्ञानिकांना मोठं यश

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव