शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

म्हैस चारण्यास गेलेल्या महिलेची गळा चिरून हत्या; पाय छाटून चोरट्यांनी लंपास केले पैंजण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 20:09 IST

Murder Case : जयपूर ग्रामीणचे एसपी शंकर दत्त शर्मा यांनी सांगितले की, ती महिला म्हैस चरायला गेली असताना अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी महिलेचे पाय कापून तिच्या पायातील चांदीची पैंजण चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूर येथील खाटेपुरा येथे अज्ञात हल्लेखोरांनी एका महिलेचा गळा चिरून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी महिलेच्या हत्येनंतर ग्रामस्थांनी धरणे धरत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.३० पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेतजयपूर ग्रामीणचे एसपी शंकर दत्त शर्मा यांनी सांगितले की, ती महिला म्हैस चरायला गेली असताना अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी महिलेचे पाय कापून तिच्या पायातील चांदीची पैंजण चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्राथमिक तपासात ही चोरीची घटना असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांची ३० पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.संतप्त ग्रामस्थ आरोपींना तात्काळ अटक करा, नुकसान भरपाई आणि कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी द्या अशी मागणी करत आहेत. गीता देवी नावाच्या महिलेचे वय ५५ वर्षे होते. गावकरी तेथून मृतदेह नेऊ देत नाहीत. आम्ही ग्रामस्थ आणि कुटुंबीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.महिलांवरील गुन्ह्यात राजस्थान अव्वल : भाजपदरम्यान, भाजपचे राज्यसभा सदस्य किरोडीलाल मीणा यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उद्देशून त्यांनी ट्विट केले की, 'तुम्हा महिलांना उत्तर प्रदेशमध्येच असुरक्षित वाटत आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थान देशात अव्वल असल्याची लाजिरवाणी वस्तुस्थिती आहे. महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून राज्याचे प्रमुख केवळ त्यांच्याच कामकाजात व्यस्त असल्याचा आरोप मीना यांनी केला.त्याचवेळी भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी राजस्थानमध्ये अशा घटना सर्रास घडल्या असून त्या मीडियात येऊ नयेत म्हणून लपवल्या जात असल्याचं म्हटलं आहे. गुन्हेगारांचा वावर एवढा वाढला आहे की पोलिसांचा धाक उरलेला नाही. ते केवळ मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. काँग्रेस सरकार स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRajasthanराजस्थानDeathमृत्यूRobberyचोरी