शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

"तुझ्या आईला कुणीतरी गोळी मारलीय"; १४ वर्षीय मुलीला आला फोन, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 4:36 PM

सात वाजेपर्यंत ज्योतीने मुलीला फोन केला तोपर्यंत सर्व काही ठीक होते, मग काही वेळात काय झाले की ज्योतीला गोळी मारली हा प्रश्न मुलांना पडला आहे.

नवी दिल्ली - सात वाजण्याच्या सुमारास १४ वर्षांच्या रियाचा फोनवर मेसेज टोन वाजते. ती मेसेज चेक करते. मेसेज रियाच्या आईचा होता. 'थोड्या वेळात घरी पोहोचेन, चहा बनवून ठेव'. मेसेज वाचून थोड्या वेळाने रिया चहा बनवते, पण बराच वेळ होऊनही आई घरी परतली नाही तेव्हा ती अस्वस्थ होते. रियाची एक लहान बहीण आणि लहान भाऊ देखील घरी आईची वाट पाहत आहेत. तेवढ्यात रियाचा फोन वाजतो.

रियाने फोन उचलताच एक अनोळखी व्यक्ती तिला सांगते - 'तुझ्या आईला कोणीतरी गोळी मारली आहे' हे शब्द रियाच्या कानात घुमतात. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, तोंडातून शब्दच निघत नाहीत. ही घटना दिल्लीतील विकासपुरी आणि पीरागढ़ी भागातील आहे, जिथे दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने रियाची आई ज्योती यांना भर रस्त्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर पळून गेला. राजधानी दिल्लीत संध्याकाळी ७.३० च्या सुमारास गर्दीच्या ठिकाणी एका महिलेची हत्या करण्यात आली, मात्र मारेकऱ्याचा पत्ता लागलेला नाही. महिलेची पर्स आणि मोबाईलही घटनास्थळी पडून होता, त्यामुळे ज्योतीची हत्या दरोड्याच्या उद्देशाने झाली असावी असं म्हणता येणार नाही. मात्र, अद्याप ज्योतीच्या स्कूटीचा शोध लागलेला नाही.

मृत महिला कुरिअर कंपनीत डिलिव्हरी एजंट होतीज्योतीचा पती दीपक प्लास्टिकच्या कारखान्यात काम करतो. तीन अपत्ये असल्याने घरखर्च चालवण्यात अडचणी येत होत्या. मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी ज्योतीने पतीला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. अवघ्या महिन्याभरापूर्वी तिने फ्लिपकार्टमध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून नोकरी सुरू केली. आता घरची परिस्थिती चांगली होईल, मुलांना त्रास होणार नाही, या आशेवर होत्या. 

तीन मुलांच्या आईचा मारेकरी कोण?सात वाजेपर्यंत ज्योतीने मुलीला फोन केला तोपर्यंत सर्व काही ठीक होते, मग काही वेळात काय झाले की ज्योतीला गोळी मारली. तीन मुलांच्या आईचे कोण शत्रू होतं का? मुलांचे अश्रू थांबत नाहीत. त्यांच्या आईने कोणाचे काय बिघडवलं होतं? हे त्यांना समजत नाही. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ज्योती किंवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे कोणाशीही भांडण किंवा वैर नव्हते. ज्योती त्याच्या लहान कुटुंबात खूप आनंदी होत्या. छोटे छोटे क्षण आनंदाने साजरे करत होते.

घटनेवेळी स्कूटी चालवत होती महिलारोजच्या प्रमाणे ज्योती दुपारी कामाहून स्कूटीवरून घरी निघाली होती आणि संध्याकाळी तिला परतायचे होते. सकाळी ती आपल्या मुलांना शाळेत घेऊन जायची आणि नंतर त्यांना दिवसा घरी सोडायची. मुलांना घरी सोडल्यानंतरच ती कामावर निघून गेली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीचा कोणाशीही काही संबंध नव्हता, मग तिची हत्या का झाली हा प्रश्न आहे. 

अद्याप मारेकऱ्याचा सुगावा लागलेला नाहीपोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे, मात्र अद्यापपर्यंत हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मारेकऱ्याचाही शोध लागला नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज काढण्यात आले, मात्र अद्यापपर्यंत मारेकऱ्याची ओळख पटलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे ही घटना मीरा नगरच्या गजबजलेल्या सिग्नल परिसराच्या अगदी जवळ घडली, मात्र कोणीही गोळी झाडताना पाहिली नाही असे अनेक प्रश्न या हत्याकांडाशी निगडीत आहेत, मात्र त्याची उत्तरे अद्याप कुणालाही मिळाली नाहीत.