शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

यूपीत गदारोळानंतर योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये, 'हायलेव्हल' बैठक अन् 116 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 9:41 PM

Yogi Government in Action Mode : अशा परिस्थितीत योगी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यात आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त टिपण्णी करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे भाजपमधून निलंबित करण्यात आले. मात्र, त्यांच्या  वादग्रस्त वक्तव्यावरून शुक्रवारी नमाजानंतर देशातील अनेक शहरांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून अनेक शहरांमध्येही हिंसाचार पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत योगी सरकार क्शन मोडमध्ये आले आहे. राज्यात आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत सद्य परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सरकारने अधिकाऱ्यांना दिल्याचे बोलले जात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना कठोर धडा शिकवला जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, कारवाई करत प्रशासनाने सहारनपूरमध्ये 38, हाथरसमध्ये 24, आंबेडकर नगरमध्ये 23, प्रयागराजमध्ये 22, मुरादाबादमध्ये 7 आणि फिरोजाबादमध्ये 2 जणांना अटक केली आहे. 

प्रयागराजमध्ये हिंसाचार करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कडक कारवाईसहारनपूरचे एसएसपी म्हणाले की, गोंधळ प्रकरणी पोलिसांनी 38 जणांना अटक केली आहे. याशिवाय हाथरसमध्ये 24 जणांना अटक करण्यात आली आहे. हाथरसमध्ये झालेल्या गदारोळानंतर रस्त्यांवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. डीआयजी दीपक कुमार म्हणाले की, हे एक छोटे शहर आहे, दगडफेक झाली आहे, कडक कारवाई केली जात आहे, शांतता राखली जात आहे.मात्र, आठवडाभर याच विधानावरून प्रचंड दंगल झालेल्या कानपूरमध्ये सर्वसाधारणपणे शांतता होती. कडक पोलीस बंदोबस्तामुळे कानपूरमध्ये कोणताही गोंधळ झाला नाही. पण इतर शहरांमध्ये पोलिसांना अशी भीती नव्हती, तरीही नमाज्यांनी घोषणाबाजी केली आणि गोंधळ झाला. यानंतर उत्तर प्रदेश सरकार कारवाईच्या मोडमध्ये आले आहे.

 

राज्यातील विविध शहरांमध्ये दगडफेकीच्या घटनांनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ACS गृह अवनीश अवस्थी, कार्यवाहक DGP, ADG कायदा आणि सुव्यवस्था सारखे अधिकारी पोलिस मुख्यालयातून परिस्थितीवर करडी लक्ष ठेवून आहेत. सर्व जिल्ह्यांतून अहवाल मागवले जात आहेत.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकstone peltingदगडफेक