शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

संचारबंदीच्या काळात ११ हजार पॉझिटीविह, १५ दिवसांनंतरही रुग्णसंख्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:53 AM

संचारबंदीच्या पूर्वीचे १५ दिवस लक्षात घेता त्यावेळीही असाच दर होता. ३१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत २२ हजार ...

संचारबंदीच्या पूर्वीचे १५ दिवस लक्षात घेता त्यावेळीही असाच दर होता. ३१ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत २२ हजार ८ चाचण्या झाल्या. त्यातून ६ हजार ५४५ रुग्ण आढळून आले. तेव्हाही पॉझिटिव्हिटी रेट हा २९.७३ टक्के इतका होता. या काळात उपचार घेऊन ३ हजार १८८ रुग्ण बरे झाल्याचे अहवाल सांगतो. हा दर मात्र, केवळ ४८.७० टक्के इतका आहे. संचारबंदीच्या काळात चाचण्या वाढल्या, ही चांगलीच बाब. मात्र, पॉझिटिव्हिटी रेट हा केवळ २ टक्क्यांनी घसरला. रुग्ण बरे होण्याचा दर फारसा बदललेला नाही. त्यामुळे संचारबंदीने केवळ पॉझिटिव्हिटी रेट आणखी वाढू दिला नाही, हेच काय ते फलित मानावे लागेल.

या कारणांमुळे रुग्णसंख्या कायम...

१. संचारबंदी लागू केली तरी नागरिकांच्या वावरण्यावर फारशा मर्यादा प्रशासनाला आणता आल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर लोकांची वर्दळ कायम राहिली.

२. रुग्ण बाधित आल्यानंतर त्यास गृहविलगीकरणात पाठविण्यावर भर राहिला. नंतर त्यावर केवळ टेलिफोनिक वॉच उरला. परिणामी, प्रसार कायम राहिला.

३. पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे रुग्ण व त्याच्या संपर्कातील लोकांचे ट्रेसिंग झाले, त्याप्रमाणे यावेळी झाले नाही. आता तर लोक स्वत:हूनच चाचणी करून घेत आहेत.

ग्रामीण भागात वाढली रुग्णसंख्या...

दुसऱ्या लाटेत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे शहरी भागात अधिक होते. त्यातही एकट्या उस्मानाबाद शहरानेच जवळपास निम्मा वाटा उचलला होता. मात्र, आता उस्मानाबाद शहरातील रुग्णसंख्या घटली असून, ग्रामीण भागात गावागावात संसर्ग पोहोचत आहे. कारण, ग्रामीण भागात अजूनही मास्क व सुरक्षित अंतराची काळजी घेतली जात नाही. या स्वैर वर्तनावर निर्बंध आणण्यासाठी यंत्रणाही झटकून काम करताना दिसत नाही.