शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

सरकारी जमिनीवर विमा भरून सरकारलाच ३ कोटींना गंडविले; २४ सीएससी चालकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 18:17 IST

खरीप हंगाम २०२३ मध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात विमा भरण्याची सुविधा दिली होती.

धाराशिव : मागील खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर शेतकऱ्यांच्या नावे विमा हप्ता भरला गेल्याची बाब उघडकीस आली आहे. कृषी विभागाने चौकशी केल्यानंतर धाराशिवसह बीड, सोलापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यातील २४ सीएससी चालकांनी कोट्यवधींची भरपाई ढापण्यासाठी हा उद्योग केल्याचे स्पष्ट झाले. या संबंधितांवर धाराशिवच्या आनंदनगर ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरीप हंगाम २०२३ मध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात विमा भरण्याची सुविधा दिली होती. शेतकरी हिस्सा जितका असेल तो राज्य शासनच भरणार असल्याचे जाहीर केले होते. ही संधी साधत पाच जिल्ह्यातील २४ सीएससी चालकांनी धाराशिव जिल्ह्यात असलेल्या २ हजार ९९४ हेक्टर सरकारी जमिनीवर ११७० शेतकऱ्यांच्या नावाने विमा हप्ता भरला. निर्णयाप्रमाणे राज्य सरकारने या शेतकऱ्यांचा विमा हिस्सा ३ कोटी १३ लाख ७१ हजार ६३५ रुपये विमा कंपनीकडे जमा केला. दरम्यान, विमा कंपनीकडून अग्रीम वाटपाची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा सरकारी जमिनीवरही विमा भरला गेल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

ही बाब जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांना चौकशी करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या. या अनुषंगाने केलेल्या चौकशीत तथ्य आढळून आल्यानंतर ६ मार्च रोजी कृषी उपसंचालक बाबासाहेब वीर यांनी आनंदनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी २४ जणांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

आरोपी केंद्रचालक सहा जिल्ह्यातील...संग्राम प्रभू मुरकुटे, राहुल शिवाजी चाटे, रवी नारायण पुरी, लक्ष्मण विनायक आघाव, महादेव गणपती वरकले, कृष्णा बालाजी आंधळे, महेश सोमनाथ बुरांडे, गजानन व्यंकट होळंबे, अजय दत्तात्रय गुट्टे, विश्वनाथ व्यंकट आघाव, अमर सुभाषराव देशमुखे, धनराज महादेव होळंबे, रवींद्र दामोदर मुंढे, नंदनी रावसाहेब होळंबे, विष्णू महादेव नागरगोजे, विजय गिरीधारी फड (सर्व जि.बीड), कृष्णा राम आंधळे, कुणाल जयदेव मुळे (दोघेही जि. छत्रपती संभाजीनगर), संदेश वैजनाथ मुंढे, धनराज उत्तम चैधर (दोघे जि. परभणी), रघुनाथ प्रभू घोडके (जि. नांदेड), नावजी सौदागर अनभुले (जि. सोलापूर), पांडुरंग जयराम भाेगील व एक अज्ञात (जि. धाराशिव) अशी या आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCrop Insuranceपीक विमाOsmanabadउस्मानाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र