शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

५५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:36 AM

उस्मानाबाद : खरीप हंगाम संपत आला असतानाही कर्ज वाटपात बॅंकांची उदासीनता कायम आहे. अद्यापपर्यंत केवळ ९४ हजार ९६४ शेतकऱ्यांना ...

उस्मानाबाद : खरीप हंगाम संपत आला असतानाही कर्ज वाटपात बॅंकांची उदासीनता कायम आहे. अद्यापपर्यंत केवळ ९४ हजार ९६४ शेतकऱ्यांना ६९१ कोटी ७९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ४५ टक्के इतकी आहे, तर ५५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

वर्षा-दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी अशा संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असतो. यंदा पिकांचे नुकसान झाले, तर पुढील वर्षी चांगले उत्पादन मिळेल, या आशेवर शेतकरी पिके घेत असतात. शेती कामांसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता भासत असते. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी रक्कम मिळावी, यासाठी शासनाकडून पीककर्ज उपलब्ध करून दिले जाते. उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कर्ज वितरणास प्रारंभ झाला. कोरोनामुळे एप्रिल व मे महिन्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात एसटी बस बंद असल्याने ग्रामीण भागातून शेतकऱ्यांना शहरातील बँकामध्ये येता येत नव्हते. त्यामुळे कर्ज वितरणाची गती मंदावलेली होती. जून महिन्यापासून निर्बंध शिथिल झाले, तसेच जून महिन्यात पाऊसही झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. जून-जुलै, ऑगस्ट महिन्यातही कर्ज वाटपास म्हणावी तशी गती आलेली दिसत नाही. १५ ऑगस्ट अखेरपर्यंत ४ हजार ९६४ शेतकऱ्यांना ६९१ कोटी ७९ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ४५ टक्के इतकी असून, अद्याप ६५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्ज वाटपात आघाडीवर

जिल्ह्यास खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेस २६९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. या बँकेने १९ हजार ३९२ शेतकऱ्यांना १६७ कोटी ७ लाख रुपये कर्ज वितरित केले आहे. त्याची टक्केवारी ६२ इतकी आहे. त्या खालोखाल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेने ४६ हजार २३३ शेतकऱ्यांना १८४ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज वाटत केले. त्याची टक्केवारी ५६ इतकी आहे.

खरीप हंगाम संपत आला असून, मूग, उडीद पीक काढणीस आले आहेत. सोयाबीन पीक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. मूग, उडीद पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. या शेतकऱ्यांना मळणी, मजुरासाठी पैशाची आवश्यकता भासत आहे. मात्र, अशा स्थितीत पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.