शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

विहीरीच्या पाण्यावरून वाद पेटला, कोयत्याने वार करून चुलत भावाचा खून केला

By बाबुराव चव्हाण | Updated: November 13, 2023 19:15 IST

विहिरीतील पाणी रबी पिकाला देण्याच्या कारणावरून घडली घटना

नळदुर्ग (जि. धाराशिव) : विहिरीचे पाणी रबी पिकांना देण्यासाठी कृषी पंपाला विद्युत जोडणी करीत असताना सख्ख्या चुलत भावानेच पाठीमागून कोयत्याने वार केले. या हल्ल्यात पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा गंभीर जखमी हाेऊन मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील सराटी येथे साेमवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली.

सराटी येथील शेतकरी नरसप्पा बाबूराव पाटील (४५) हे शेतातील रबी पिकाला पाणी देण्यासाठी रविवारी सायंकाळी विहिरीत विद्युतपंप सोडून त्यास साेमवारी सकाळी वीजपुरवठा जोडत असताना चुलत भाऊ नवनाथ अप्पाराव पाटील यांनी पाठीमागून कोयत्याने डोक्यात वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असता मारेकरी भाऊ घटना स्थळावरून फरार झाला. यानंतर नातेवाइकांनी गंभीर जखमी अवस्थेत नरसप्पा पाटील यांना उपचारासाठी दुचाकीवरून अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, दवाखाना बंद असल्याने त्यांच्यावर येथे उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना साेलापूर येथील दवाखान्यात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डाॅक्टरांनी त्यांना मयत घाेषित केले. घटनेची माहिती मिळताच सपोनि स्वप्निल लोखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन गावात पाेलिस बंदोबस्त तैनात केला. घटनेतील मारेकरी फरार असून पाेलिसांनी त्याचा शाेध सुरू केला आहे. मयताच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

...अन् जीव गमवावा लागला...मयत व आराेपी यांच्या नावे सराटी शिवारात तीन एकर वडिलाेपार्जित शेतजमीन आहे. याच शेतातील विहिरीचे पाणी पिकांना देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एकाला जीव गमवावा लागला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद