शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

पुन्हा तांत्रिक घोळ, विमा कंपनीस सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:40 AM

उस्मानाबाद : पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस ७२ तासांत देणे अनिवार्य आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणेच यंदाही वीज, इंटरनेट तसेच ...

उस्मानाबाद : पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस ७२ तासांत देणे अनिवार्य आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणेच यंदाही वीज, इंटरनेट तसेच सर्व्हर डाऊन अशा अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कंपनीस पत्र देऊन याबाबत सूचित केले आहे.

गतवर्षी अतिवृष्टीनंतर अनेक गावांत वीज नव्हती. इंटरनेटची समस्या निर्माण झाली. तसेच तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी कंपनीस ७२ तासात नुकसानीची माहिती देऊ शकले नाहीत. परिणामी ३ लाखांवर शेतकऱ्यांना पात्र असतानाही अद्याप विमा मिळू शकला नाही. दरम्यान, यावर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, अन्य ठिकाणीही सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, कंपनीच्या ॲपवर नुकसानीची माहिती देण्याचा काही शेतकऱ्यांनी प्रयत्न केला असता, तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना माहिती देता आली नाही. तसेच यावेळीही इंटरनेट, विजेची समस्या आहेच. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कंपनीस पत्र देऊन ही बाब अवगत केली आहे. हे पत्र पुढे नुकसान भरपाईच्या मागणीवेळी मोलाची भूमिका बजावू शकते. शिवाय, त्यांनी शेतकऱ्यांनाही नुकसानीची माहिती ७२ तासात विमा कंपनी, कृषी विभागास देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवावा, असे आवाहनही केले आहे.