शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
4
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
5
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
6
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
7
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
8
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
9
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
10
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
11
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
12
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
13
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
14
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
15
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
16
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
17
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
18
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
19
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
20
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

व्याज परतावा योजनेला बँकेकडून खीळ;१५ टक्केच प्रस्तावांना मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 18:13 IST

स्वत:च्या पायावर उभे राहण्याची खटपट तुर्त व्यर्थच...

ठळक मुद्देकेवळ २०३ प्रकरणाला बँकेचे पाठबळ मिळाले आहे. प्रस्तावांना आर्थिक बळ देतांना बँका हात आखडता घेत असल्याने संतापसोळा महिन्यात १ हजार ६०० वर प्रस्ताव धडकले

उस्मानबाद/कळंब : मागील १६ महिन्यात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने व्याज परतावा योजनेत मंजूरी दिलेल्या १ हजार ६०० प्रस्तावांपैकी केवळ २०३ प्रकरणाला बँकेचे पाठबळ मिळाले आहे. एकीकडे बेरोजगारांना सक्षम होण्यासाठी शासन प्रवृत्त करत असताना दुसरीकडे अशा प्रस्तावांना आर्थिक बळ देतांना बँका हात आखडता घेत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने २७ नोंव्हेबर १९९८ रोजी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाद्वारे विविध योजना बेरोजगारापर्यंत पोहचून त्यांना सक्षम बनवणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणण्याचे काम करण्यात येत आहे.राज्याच्या रहिवाशी असलेल्या व वयाच्या कमाल पन्नासीची अट असलेल्या व्यक्तिंना यासाठी महास्वयंम या वेबपोर्टलवर प्रथम नाव नोंदणी करावी लागते. यानंतर वार्षिक उत्पन्न मर्यादित असलेले व इतर कोणत्याही योजनेचा लाभ न घेतलेले व्यक्ती या महामंडळाकडून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना आदी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घेवू शकतात. दरम्यान, मागील सोळा महिन्यात जिल्हाभरातून सुमारे १ हजार ६०० पेक्षा अधिक प्रस्तावांना आर्थिक विकास महामंडळाकडून मंजुरी देण्यात आली होती. हे प्रस्ताव बँकांकडे दाखल झाल्यानंतर याच गतीने प्रस्ताव निकाली निघणे अपेक्षित आहे. परंतु, याच ठिकाणी प्रस्तावांना खीळ बसत आहे. १ हजार ६०० पैकी बँकांनी केवळ २०३ प्रस्तवांना मंजुरी दिली आहे. म्हणजेच साधारपणे पंधरा ते सोळा टक्केच प्रस्तावांना व्याज परतावा मिळणार आहे. त्यामुळे बेरोजगार तरूणांतून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.

दुष्काळी भागात तरी...उस्मानाबाद जिल्ह्याच्या भाळी दुष्काळी तालुका असा शिक्का मोर्तब झालेले आहे. जिल्हा शेतकरी आत्महत्यामध्ये मराठवाड्यात अग्रभागी आहे. त्यामुळे अशा ल्ह्यिातील बेरोजगार तरूणांना सक्षम करण्यासाठी एकीकडे  महामंडळ पात्रता प्रमाणपत्र देवून कर्ज योजना प्रस्तावास मान्यता देत असतांना  दुसरीकडे बँकाच या प्रयत्नांना खोडा घालत आहेत हे मोठे दुर्देवी आहे. 

स्वत:च्या पायावर उभे राहण्याची खटपट तुर्त व्यर्थच...कळंब तालुक्यातील ईटकूर येथील बिभीषण सोमनाथ कुंभार या सुशिक्षित बेरोजगार तरूणांने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे वैयक्तिक कर्ज परतावा योजनेसाठी आपला प्रस्ताव दाखल केला होता. यानंतर ३ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांची लाभार्थी म्हणून निवड झाली. यासाठी त्याला १० लाख रूपयाचे बँक कर्ज हवे होते. यासाठी महामंडळाचे पत्र, प्रकल्प अहवाल, इनकम रिटर्न, जिएसटी, आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रशिक्षण प्रमाणपत्र, सात बारा व आठ अ, रेशन कार्ड आदी कागदपत्रासह कर्ज मागणीचा प्रस्ताव कळंब येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक, एसबीआई व कॅनरा बँक या तीन बँकेकडे सादर केला. परंतु, अनेक महिन्यांपासून या बँका कुंभार यांना केवळ झुलवत आल्या आहेत. कोण कार्यक्षेत्राचा, कोण उद्दीष्टाची तर कोण कर्ज देता येत नसल्याचे कारण देत आहेत. यामुळे या तरूणांची स्वत:च्या पायावर उभे राहण्याची खटपट तुर्त तरी व्यर्थ ठरली असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कुंभार हे एक प्रातिनिधीक उदाहरण असून असे अनेक बिभीषण खस्ता खात आहेत.

आमच्या मुख्य कार्यालयाने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत आजवर पात्रता प्रमाणपत्र दिलेल्या सोळाशेपैकी २०३ प्रस्तावांना बँकेने कर्ज दिले आहे. वारंवार होणाºया बैठकात किंवा संबंधीत बँकाना पत्र देवून आम्ही याप्रकरणी वित्तसहाय्य करण्याचे सुचीत करत आलो आहोत.- प्रशांत घुले,जिल्हा समन्वयक, आण्णासाहेब पाटील आ. वि. महामंडळ

टॅग्स :fundsनिधीAnnasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळOsmanabadउस्मानाबाद