शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

तुळजाभवानी संस्थानचा मोठा निर्णय; मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जाणाऱ्यांची होणार नोंद

By बाबुराव चव्हाण | Updated: July 18, 2024 11:32 IST

पाेलिसांच्या पत्रानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून घेण्यात आला महत्वपूर्ण निर्णय

धाराशिव/तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्यांच्या नाेंदी ठेवण्याबाबतची सूचना एका पत्राद्वारे उपविभागीय पाेलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आली हाेती. यासाठी सुरक्षेचे कारण देण्यात आले आहे. याच पत्राचा संदर्भ देत मंदिर संस्थानकडून गुरूवारपासून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील प्रवेशांच्या नाेंदी ठेवणे बंधनकारक केले आहे. तसे आदेशही काढले आहेत.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ असून दर्शनासाठी देशाच्या कानाकाेपऱ्यातून भाविक येतात. त्यामुळे वर्षातील बाराही महिने भाविकांची गर्दी असते. पुजाऱ्यांसह अनेक भाविक देवी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जावून दर्शन घेतात. आजवर गाभाऱ्यातील अशा प्रवेशांच्या नाेंदी ठेवल्या जात नव्हत्या. मात्र, उपविभागीय पाेलीस अधिकारी डाॅ. निलेश देशमुख यांनी मंदिर संस्थानला दिलेल्या पत्रानंतर आता या प्रक्रियेत गुरूवारपासून महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सिंहासन पूजा आणि अभिषेक वेळ वगळता इतर वेळेत मंदिराच्या गाभाऱ्यात हाेणाऱ्या प्रवेशांच्या नाेंदी ठेवण्यात येणार आहेत. यासाठी चाेपदार दरवाजा येथे स्वतंत्र नाेंदवही असेल. या वहिमध्ये प्रक्षाळ व चरणतीर्थ पुजेवेळी गाभाऱ्यात जाणाऱ्यांची नाेंद केली जाणार आहे. मंदिर संस्थानचे तहसीलदार तथा व्यवस्थापक साेमनाथ माळी यांनी यासंदर्भातील पत्रक जारी केले आहे.

मनमानी प्रवेशाला बसेल आळा...आजवर श्री तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात हाेणाऱ्या प्रवेशांची नाेंद घेतली जात नव्हती. मात्र, गुरूवारपासून नाेंद ठेवली जाणार असल्याने आता गाभाऱ्यात हाेणाऱ्या मनमानी प्रवेशाला आळा बसेल व प्रक्रियेत सुसूत्रता येईल, असा दावा मंदिर संस्थानच्या सूत्रांनी केला आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबाद