शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
3
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
4
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
8
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
9
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
10
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
11
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
13
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
14
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
15
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
16
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
17
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
18
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
19
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
20
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!

शौचालयाचा खड्डा खोदताना दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:21 AM

माणकेश्वर (जि.उस्मानाबाद) : शौचालयाची पहिली टाकी भरल्याने दुसरा खड्डा तयार करताना लगतची टाकी फुटून त्यातील पाणी नव्या खड्ड्यात शिरल्याने ...

माणकेश्वर (जि.उस्मानाबाद) : शौचालयाची पहिली टाकी भरल्याने दुसरा खड्डा तयार करताना लगतची टाकी फुटून त्यातील पाणी नव्या खड्ड्यात शिरल्याने त्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना माणकेश्वर (जि.उस्मानाबाद) येथे गुरुवारी दुपारी घडली आहे.

भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे ८ जुलै रोजी दुपारी संदीप भाऊ माळी यांच्या घरी शौचालयाचा शोषखड्डा खोदण्याचे काम सुरू होते. पूर्वीच्या शौचालयाचा शोषखड्डा पूर्णपणे भरून तो जाम झाल्याने लगतच नवीन खड्डा घेण्यात येत होता. हा नवीन खड्डा साधारणत: सात ते आठ फुटापर्यंत खोल गेलेला होता. उर्वरित काम करीत असतानाच शेजारील शौचालयाचा जुना खड्डा कोठे आहे, याचा अंदाज न आल्याने त्यास धक्का लागून तो फुटला. त्यामुळे जुन्या खड्ड्यातील घाण पाणी, माती हे नवीन खड्ड्यात वेगाने उतरले. यावेळी नवीन खड्ड्यात काम करीत असलेले मजूर रघुनाथ रनदिल हे पाण्यात पूर्णत: बुडाले. त्यांना कामात मदत करणारे संदीप बाळू माळी हे रघुनाथ रनदिल यांना वाचविण्यासाठी खड्ड्यात उतरले. मात्र, ते खड्ड्यात फसले. हे पाहून त्यांचे लहान भाऊ अमोल बाळू माळी हे मदतीसाठी खड्ड्यात उतरले. परंतु, खोलीचा अंदाज न आल्याने तेही पाण्यात बुडाले. या घटनेत रघुनाथ रनदिल व अमोल माळी यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच काही नागरिकांनी जेसीबीच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढून रुग्णालयात नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले. मयत मजूर रघुनाथ रनदिल (५७) यांना तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे. तर दुसरे मयत अमोल माळी (३१) यांना ३ वर्षांची मुलगी आहे. या घटनेने माणकेश्वर गावात हळहळ व्यक्त झाली.

वाचविण्यासाठी गेलेला एक जण वाचला...

मजूरकाम करीत असलेले रघुनाथ रनदिल हे पाण्याखाली गेल्याचे पाहून संदीप माळी हे खड्ड्यातील पाण्यात उतरले. मात्र, ते अर्ध्यातच फसल्याने डोके वर राहिले. मात्र, दुर्गंधीने ते बेशुद्ध पडले. हा प्रकार लक्षात येताच संदीप यांचे भाऊ अमोल माळी यांनी दोघांनाही वाचविण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली. मात्र, लागलीच तेही या पाण्यात बुडून खाली गेले. ही घटना कळताच नागरिकांनी जेसीबी आणून सर्वांना बाहेर काढले. तेव्हा रघुनाथ व अमोल हे मृत झाले होते. तर संदीप हे काळी वेळाने शुद्धीवर आले.