शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
2
अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
3
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
4
Share Market Opening : दुसऱ्या दिवशीही नफा वसूली; १५० अंकाच्या घसरणीसह बाजार उघडला; IT शेअर्सवर दबाव
5
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
6
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
7
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
8
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
9
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
10
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
11
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
12
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
14
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
15
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
16
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
17
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
18
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
19
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
20
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!

प्रलंबित खरीप पिकविमा-२०२० संदर्भात केंद्र शासन,कंपनीने ८ आठवड्यात उत्तर द्यावे, खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 3:04 PM

वंचित शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आ.ज्ञानराज चौगुले यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

लोहारा ( उस्मानाबाद) : प्रलंबित खरीप पीकविमा-२०२० च्या संदर्भात केंद्र शासन व पिक विमा कंपनीने आठ आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा खरीप-२०२० चा पिकविमा प्रलंबित आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. यावर ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने वरील आदेश पारित केले. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील ९ लाख ४८ हजार ९९० शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मात्र, केवळ ७९ हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी आ.ज्ञानराज चौगुले यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ७२ तासात पूर्वसूचना दिली नाही. हे कारण दाखवून पिक विमा कंपनीने विमा नाकारला होता. राज्य आपत्ती निवारण निधी व केंद्र आपत्ती निवारण निधी अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात भरीव अशी मदत मिळाली असून महसूल व कृषीचे नुकसान झाल्याचे पंचनामे असल्याने विमा कंपनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून मदत नाकारू शकत नाही इत्यादी मुद्दे घेऊन आ.चौगुले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. 

तसेच शेतकऱ्यांच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातून दाखल झालेली एक जनहित याचिका व आ.ज्ञानराज चौगुले यांची जनहित याचिका एकत्रित करण्याचे आदेशही यावेळेस कोर्टाने दिले आहेत.आ.ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने अँड.श्रीकांत वीर व अँड.सुनिल कोळी हे काम पाहत असून त्यांना न्यायालयीन कामकाजात अनिल जगताप हे मदत करत आहेत. पुढील सुनावणी २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाOsmanabadउस्मानाबाद