शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

तृतीयपंथीय व्यक्तींना जमीन देण्याच्या मुद्द्यावर समितीत ‘एकमत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:27 AM

उस्मानाबाद : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना जगण्याचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा मुद्दा जिल्हास्तरीय समितीच्या ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना जगण्याचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा मुद्दा जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत आला हाेता. या अनुषंगाने ‘एकमत’ झाल्यानंतर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगाकवर यांनी समाज कल्याण आयुक्तांचे मार्गदर्शन मागविण्याचे निर्देश समिती सचिव तथा सहाय्यक अयुक्त बी. जी. अरवत यांना दिले. आयुक्तांचा हिरवा कंदील मिळाल्यास तृतीयपंथीय व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी हक्काचे साधन उपलब्ध हाेणार आहे.

तृतीयपंथीय यांच्या समस्या तसेच तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांचा समावेश असणारी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत तृतीयपंथीय यांच्या नाेंदणीसंदर्भात सुरुवातीला चर्चा झाली. याबाबत समिती अध्यक्ष दिवेगावकर यांनी तसे निर्देश सहाय्यक आयुक्त तथा समिती सचिव अरवत यांना देण्यात आले. यानंतर समिती सदस्य कलीम आयुब कागदी यांनी तृतीयपंथीय यांना जगण्याचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे, यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान याेजनेच्या माध्यमातून कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. ज्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना याेजनेचा लाभ देताना जातीचा विचार केला जात नाही, त्याप्रमाणेच तृतीयपंथीय यांच्याबाबतही विचार व्हावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. समितीतही त्यांच्या या मागणीवर एकमत झाले. यानंतर समिती अध्यक्ष दिवेगावकर यांनी या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्तांकडून मार्गदर्शन मागवावे, असे निर्देश समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अरवत यांना दिले.

दरम्यान, उपराेक्त विषयास आयुक्तांचा हिरवा कंदील मिळाल्यास अशा प्रकारची याेजना हाती घेणारा उस्मानाबाद हा राज्यातील पहिला जिल्हा ठरू शकताे.

चाैकट...

नाेंदणी झाल्यानंतर तृतीयपंथीय यांना विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते काढणे, काेविड लसीकरण उपलब्ध करून देणे, बचतगट तयार करणे, घरकुल याेजनेचा लाभ देणे, महामंडळ तसेच बॅंकांकडून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या माध्यमातून तृतीयपंथीय यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बी. जी. आरवत यांनी सांगितले.