शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
4
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
5
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
6
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
7
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
8
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
9
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
10
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
11
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
12
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
13
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
14
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
15
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
16
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
17
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
18
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
19
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
20
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

कोरोनाने हिरावले ५७ मुलांचे पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:32 AM

उस्मानाबाद : आतापर्यंत कोरोनाचे संकट हे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांवर कहर ठरत होते. मात्र, दुसऱ्या लाटेत प्रौढांची संख्या मोठ्या प्रमाणात ...

उस्मानाबाद : आतापर्यंत कोरोनाचे संकट हे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांवर कहर ठरत होते. मात्र, दुसऱ्या लाटेत प्रौढांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकांनी आपली लहान बालके पाठिशी ठेवून जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अशा बालकांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना मदत व्हावी, याअनुषंगाने जिल्ह्यात आता सर्वे सुरु झाला असून, आईवडील दोघेही किंबहुना आई किंवा वडील मृत्युमुखी पडलेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे.

जिल्ह्यात आजवर कोरोनामुळे साडेअकराशे पेक्षाही जास्त बळी गेले आहेत. पहिल्या लाटेत मृत्युमुखी पडणारे सर्वाधिक हे ज्येष्ठ नागरिक होते. मात्र, आता दुसऱ्या लाटेत प्रौढांचे प्रमाणही चांगलेच वाढीस लागले आहे. परिणामी, त्यांच्या लहान बालकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अशा बालकांचा शोध घेण्यात येत आहे. ज्यांचे पालक कोरोनाने हिरावले आहेत, त्यांना आर्थिक, शैक्षणिक आधार देण्याच्या अनुषंगाने ही शोधमोहिम सुरु असून, आतापर्यंत ५७ बालके आढळून आली आहेत. सर्वे पूर्णत्वाकडे जाईल, तसा हा आकडा आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे.

आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास ११०० रुपयांची मदत...

कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा किंबहुना दोघांचाही मृत्यू झाला असल्यास अशा बालकांना महिला व बालकल्याण विभागाच्या बालसंगोपन योजनेतून मदत करण्यात येणार आहे.

या योजनेतून यापूर्वी ४२५ रुपयांची मदत मिळत होती. आता सरकारने ही मदत दरमहा अकराशे रुपयांपर्यंत वाढवली आहे.

बालकल्याण विभाग अशा बालकांचा अहवाल बाल समितीसमोर सादर करेल. नातेवाईक सांभाळ करण्यास तयार झाले तर त्यांना अकराशे रुपयांची मदत वर्षभर मिळणार आहे.

या अनाथ मुलांचे सरकार करणार काय...

सध्या कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावोगाव घेतला जात आहे. यातून अनाथ आढळून येणाऱ्या मुलाची संपूर्ण कौटुंबिक माहिती एकत्रित केली जाणार आहे.

ज्या मुलाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. राहण्यास घर नाही किंवा सांभाळ करणारेही कोणी नाहीत, अशी परिस्थिती असेल तर त्या बालकास बाल समितीच्या माध्यमातून बालगृह, बालकाश्रमात ठेवले जाईल.

पाठिशी कोणताही आर्थिक आधार नसल्यास शासनच या बालकांच्या पुनर्वसनाचा भार उचलण्याची शक्यता आहे.

कोट...

सध्या एक पालक किंवा अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणातून घेतला जात आहे. आतापर्यंत अशी ५७ बालके आढळली आहेत. आणखीही शोध सुरुच आहे. या सर्व बालकांचा अहवाल तयार करुन बाल समितीसमोर सादर केला जाणार आहे. त्या-त्या बालकांची परिस्थिती, गरज लक्षात घेऊन मदत, पुनर्वसनाबाबत बालसमिती योग्य तो निर्णय घेईल.

- बळीराम निपाणीकर, महिला व बालविकास अधिकारी