शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाळलेल्या पिकासह शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा, ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

By गणेश कुलकर्णी | Updated: September 6, 2023 16:40 IST

वाशी तहसीलवर एल्गार मोर्चा : स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर

धाराशिव : जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी शासनाने शाश्वत पाण्याच्या उपायोजना कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी वाशी तहसील कार्यालयावर यल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतातील वाळलेल्या पिकांसह मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, वाशी तालुक्याचा खंडवृष्टीत समावेश करावा, दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी शासनाने शाश्वत पाण्याच्या उपाय योजना कराव्यात, पीक कर्ज माफ करावे, खरीप २०२४ चा पीक विमा मंजूर करावा, नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम तत्काळ द्यावी, अतिवृष्टी नुकसानाचे अनुदान राहिलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावे, २०२० चा सोयाबीन पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर जमा करावा, कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावी, पर्जन्यमापक यंत्र प्रत्येक गावोगावी बसविण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या मोर्चात जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तालुकाध्यक्ष वसंत जगताप, बिभीषण भैरट, तानाजी पाटील, गजानन भारती, मुकुंद शिंगणापुरे, शिवाजी उंद्रे, राजेश्वर कवडे, संजय कवडे, पांडुरंग घुले, बाळकृष्ण बारगजे, दादासाहेब चेडे, नाना उंद्रे, चंद्रकांत उंद्रे, चंद्रकांत चेडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.यापूर्वी दोनदा दिले निवेदनेया सर्व मागण्यांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनास यापूर्वी २४ ॲागस्ट व १ सप्टेंबर रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, या निवेदनाची शासनाने कसलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसOsmanabadउस्मानाबाद