शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
2
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
3
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
4
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
5
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
6
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
7
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
8
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम
9
“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील
10
केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
11
"मोठी डील झालीय"; तिकीट कापल्यानंतर चंद्रिकापुरेंचे थेट पत्र; म्हणाले, "अजित पवारांनी खंजीर खुपसला"
12
IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
14
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
15
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
16
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
17
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
18
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
19
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
20
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

वाळलेल्या पिकासह शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा, ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

By गणेश कुलकर्णी | Published: September 06, 2023 4:39 PM

वाशी तहसीलवर एल्गार मोर्चा : स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर

धाराशिव : जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी शासनाने शाश्वत पाण्याच्या उपायोजना कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी वाशी तहसील कार्यालयावर यल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतातील वाळलेल्या पिकांसह मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, वाशी तालुक्याचा खंडवृष्टीत समावेश करावा, दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी शासनाने शाश्वत पाण्याच्या उपाय योजना कराव्यात, पीक कर्ज माफ करावे, खरीप २०२४ चा पीक विमा मंजूर करावा, नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम तत्काळ द्यावी, अतिवृष्टी नुकसानाचे अनुदान राहिलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावे, २०२० चा सोयाबीन पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकर जमा करावा, कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना ताबडतोब द्यावी, पर्जन्यमापक यंत्र प्रत्येक गावोगावी बसविण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या मोर्चात जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तालुकाध्यक्ष वसंत जगताप, बिभीषण भैरट, तानाजी पाटील, गजानन भारती, मुकुंद शिंगणापुरे, शिवाजी उंद्रे, राजेश्वर कवडे, संजय कवडे, पांडुरंग घुले, बाळकृष्ण बारगजे, दादासाहेब चेडे, नाना उंद्रे, चंद्रकांत उंद्रे, चंद्रकांत चेडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.यापूर्वी दोनदा दिले निवेदनेया सर्व मागण्यांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनास यापूर्वी २४ ॲागस्ट व १ सप्टेंबर रोजी लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, या निवेदनाची शासनाने कसलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसOsmanabadउस्मानाबाद