शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये शिंदे गट अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? मुख्यमंत्री शिंदे-सरवणकरांमध्ये चर्चा, केसरकर म्हणाले....
2
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
4
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
5
Mutual Fund Investment : SIP की एकरकमी... कशात मिळेल जास्त रिटर्न? म्युच्युअल फंडात गुंतवणूकीची योग्य पद्धत कोणती?
6
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
7
दिवाळीपूर्वी Infosys च्या शेअरधारकांसाठी खूशखबर; शेअरवर मिळणार 'इतका' डिविडेंड, आज अखेरची संधी
8
"तो माझ्या जवळ येऊन...", भाग्यश्रीने 'मैंने प्यार किया'दरम्यानचा सलमान खानचा सांगितला 'तो' किस्सा
9
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
10
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
11
'नागिन' फेम अभिनेत्री ३६व्या वर्षी अडकली विवाहबंधनात, उत्तराखंडमध्ये बांधली लग्नगाठ
12
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
13
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
14
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
15
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
16
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
17
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
18
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
19
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
20
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात

औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा; 'धाराशिव' नावासाठी मनसे मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 7:25 PM

MNS on field for the name 'Dharashiv' for Usmanabad मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भावना मांडल्या.

ठळक मुद्देस्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर व्हावे, असे १९८८ साली जाहीर केले होते. ज्या स्वप्नासाठी सरकार स्थापन झाले, ते त्यांनी पूर्ण केलेच पाहिजे, असा आग्रह मनसेने धरला आहे. 

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहराच्या नामांतरावर बसलेली धूळ यावेळी मनसेने उडविली आहे. सोमवारी त्यांनी या संदर्भात निवेदन देऊन तातडीने ही नामांतर प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भावना मांडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारला व सरकार स्थापन केले. मग त्यांनी बाळासाहेबांचे नामांतर विषयीचे स्वप्न पूर्ण केलेच पाहिजे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर व्हावे, असे १९८८ साली जाहीर केले होते. त्यांचे हे स्वप्न होते, त्यांची ती भावना होती. मग ज्या स्वप्नासाठी सरकार स्थापन झाले, ते त्यांनी पूर्ण केलेच पाहिजे, असा आग्रह मनसेने धरला आहे. 

उस्मानाबाद हे नाव शेवटचा निजाम राजा मीर उस्मान अली याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. राज्यात शिवसेना सरकारमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने नामांतर करावे, अशी मागणीही मनसेने केली आहे. यावेळी उस्मानाबाद शहराध्यक्ष संजय पवार, तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल महाजन, उमेश कांबळे, सौरभ देशमुख, अक्षय सावळे, वेदकुमार पेंदे, रामभाऊ मोटे, नितेश कोकाटे व पदाधिकारी उपस्थित होते.

१९९५ साली प्रक्रिया१९०५ साली नळदुर्गहून जिल्हा मुख्यालय धाराशिवला हलविल्यानंतर हे नामकरण झाले आहे. त्यामुळे आता बदल करणे आवश्यक आहे, असे मनसेने नमूद केले आहे. दरम्यान, १९९५ साली युतीचे सरकार आल्यानंतर काही काळ याची प्रक्रियाही सुरू झाली होती. मात्र, नंतर ती थांबली. ती स्थिती अद्यापपर्यंत कायम आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMNSमनसे