शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

सरपंचपद अपात्रतेचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय निवडणूक आयोगाकडून रद्द

By बाबुराव चव्हाण | Published: August 10, 2024 4:52 PM

माळुंब्रा गावाच्या सरपंच सुरेखा सुतार यांना राज्य निवडणूक आयाेगाकडून दिलासा...

धाराशिव : निवडणूक खर्च विहित पद्धतीने दाखल न केल्याचा ठपका ठेवत माळुंब्रा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा नागनाथ सुतार यांना सरपंचपदावर राहण्यास जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले हाेते. या निर्णयाविराेधात निवडणूक आयाेगाकडे धाव घेतली असता, सुनावणीअंती जिल्हाधिकारी यांचा आदेश रद्द ठरविता, सुतार यांचे सरपंचपद कायम ठेवले आहे.

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली हाेती. या निवडणुकीत सरपंच म्हणून सुरेखा नागनाथ सुतार या बहुमताने जनतेतून निवडून आल्या. यानंतर जवळपास दोन वर्षांनी विनोद राजाराम देवकर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ ब (१) प्रमाणे तक्रार दाखल केली हाेती. सरपंच सुरेखा सुतार यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवत असताना, थेट सरपंच निवडणूक व एका प्रभागातून सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले हाेते. या दोन्ही नामनिर्देशनपत्रांसोबत एकच बँक खाते दर्शवले. एवढेच नाही, तर निवडणुकीचा खर्च राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विहित पद्धतीने दाखल केलेला नाही, अशा स्वरूपाचा आक्षेप नाेंदवित, अपात्र करण्याची मागणी केली हाेती. 

सुनावणीअंती जिल्हाधिकारी यांनी २४ जून २०२४ रोजी सरपंच सुरेखा सुतार यांना पदावर राहण्यास व पुढील पाच वर्षे निवडणूक लढण्यास अनर्ह ठरविले. दरम्यान, या निर्णयाविराेधात सुतार यांनी ॲड. रमेश एस. मुंढे यांच्यामार्फत राज्य निवडणूक आयाेगाकडे धाव घेतली हाेती. या प्रकरणात ३० जुलै राेजी सुनावणी ठेवण्यात आली हाेती. विशेष म्हणजे, आयाेगाने याच दिवशी अंतिम सुनावणीही घेतली असता, सुतार यांच्या वतीने ॲड. मुंढे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हाधिकारी यांचा आदेश रद्द ठरविला, तसेच सुतार यांचे सरपंचपदही कायम ठेवले. निवडणूक आयाेगाच्या या निर्णयामुळे सुतार यांना माेठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतOsmanabadउस्मानाबादElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगsarpanchसरपंच