शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

सरपंचपद अपात्रतेचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय निवडणूक आयोगाकडून रद्द

By बाबुराव चव्हाण | Updated: August 10, 2024 16:55 IST

माळुंब्रा गावाच्या सरपंच सुरेखा सुतार यांना राज्य निवडणूक आयाेगाकडून दिलासा...

धाराशिव : निवडणूक खर्च विहित पद्धतीने दाखल न केल्याचा ठपका ठेवत माळुंब्रा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा नागनाथ सुतार यांना सरपंचपदावर राहण्यास जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविले हाेते. या निर्णयाविराेधात निवडणूक आयाेगाकडे धाव घेतली असता, सुनावणीअंती जिल्हाधिकारी यांचा आदेश रद्द ठरविता, सुतार यांचे सरपंचपद कायम ठेवले आहे.

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली हाेती. या निवडणुकीत सरपंच म्हणून सुरेखा नागनाथ सुतार या बहुमताने जनतेतून निवडून आल्या. यानंतर जवळपास दोन वर्षांनी विनोद राजाराम देवकर यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ ब (१) प्रमाणे तक्रार दाखल केली हाेती. सरपंच सुरेखा सुतार यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवत असताना, थेट सरपंच निवडणूक व एका प्रभागातून सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर केले हाेते. या दोन्ही नामनिर्देशनपत्रांसोबत एकच बँक खाते दर्शवले. एवढेच नाही, तर निवडणुकीचा खर्च राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विहित पद्धतीने दाखल केलेला नाही, अशा स्वरूपाचा आक्षेप नाेंदवित, अपात्र करण्याची मागणी केली हाेती. 

सुनावणीअंती जिल्हाधिकारी यांनी २४ जून २०२४ रोजी सरपंच सुरेखा सुतार यांना पदावर राहण्यास व पुढील पाच वर्षे निवडणूक लढण्यास अनर्ह ठरविले. दरम्यान, या निर्णयाविराेधात सुतार यांनी ॲड. रमेश एस. मुंढे यांच्यामार्फत राज्य निवडणूक आयाेगाकडे धाव घेतली हाेती. या प्रकरणात ३० जुलै राेजी सुनावणी ठेवण्यात आली हाेती. विशेष म्हणजे, आयाेगाने याच दिवशी अंतिम सुनावणीही घेतली असता, सुतार यांच्या वतीने ॲड. मुंढे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हाधिकारी यांचा आदेश रद्द ठरविला, तसेच सुतार यांचे सरपंचपदही कायम ठेवले. निवडणूक आयाेगाच्या या निर्णयामुळे सुतार यांना माेठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतOsmanabadउस्मानाबादElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगsarpanchसरपंच