शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

चार गावच्या पाणीपुरवठा याेजनेची वीज ताेडली, पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:22 AM

तेर -उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, तडवळे व येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तेरणा मध्यम प्रकल्पातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ...

तेर -उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, तडवळे व येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तेरणा मध्यम प्रकल्पातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने पाणीपुरवठा याेजना राबविण्यात आली आहे. कधी धरणात पाणी नसल्याने तर कधी तांत्रिक अडचणींमुळे ही याेजना बंद राहते. मात्र, यावेळी धरणात मुबलक असले तरी सुमारे १ काेटी ९६ लाख रूपये वीजबिल थकित असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

तेरणा मध्यम प्रकल्पातून चार गाव पाणीपुरवठा योजना २००९ राेजी कार्यान्वित करण्यात आली. सुरूवातीस काही वर्षे ही याेजना सुरळीत चालल्यानंतर संंबंधित चारही गावांतील नळधारकांनी थकित पाणीपट्टी व वीजबिल न भरल्याने २०१५ मध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात आला हाेता. ही पाणीपुरवठा याेजना पुन्हा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पाणीपुरवठा पुनर्जीवन याेजनेच्या माध्यमातून सुमारे ३ काेटी ६३ लाख रूपये तरतूद २०१९ मध्ये केली. यानंतर ही याेजना कार्यान्वित झाली. दाेन-अडीच वर्ष सुरळीत पाणीपुरवठा झाल्यानंतर महावितरणची थकबाकी सुमारे १ काेटी ९६ लाखांवर जाऊन ठेपली आहे. ही थकबाकी न भरल्याने महावितरणने १७ जून राेजी वीजपुरवठा खंडित केला आहे. मागील दीड महिन्यापासून या याेजनेद्वारे पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी रानाेमाळ भटकंती करावी लागत आहे.

चाैकट...

काेट्यवधींची थकबाकी...

चारगाव पाणीपुरवठा याेजनेच्या वीजबिलापाेटी एप्रिल २०२१ अखेर सुमारे १ काेटी ९६ लाख ६४ हजार ६३५ रूपये थकित आहेत. एवढेच नाही तर पाणीपट्टीचे ही सुमारे ९६ लाख ८७ हजार रूपये थकले आहेत. यात तेर गावातील नळ जाेडणी धारकांकडे ३८ लाख ७८ हजार, ढाेकी ३७ लाख ६१ हजार, तडवळा ग्रामस्थांकडे २० लाख ४७ हजार रूपये थकित आहेत.

साेलार प्रकल्पासाठी पुढाकार कधी?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारगाव पाणीपुरवठा याेजना काेणत्या कारणामुळे अडचणीत आली, याची माहिती मागितली हाेती. या माहितीच्या आधारे थकित वीजबिलांचे कारण समाेर आले हाेते. त्यामुळे त्यांनी साेलार प्रकल्पास मंजुरी दिली हाेती. या प्रकल्पाचा आराखडाही तयार झाला हाेता. परंतु, अद्याप टेंडर निघाले नाही. त्यामुळे नेतेमंडळी याबाबतीत पुढाकार घेणार तरी कधी? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

स्थायीच्या बैठकीतही चर्चा....

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही या पाणीपुरवठा याेजनेंतर्गत चर्चा झाली. ही याेजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करून घेण्याच्या अनुषंगाने अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी मुद्दा मांडला. त्यानुसार सखाेल चर्चा हाेऊन जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसाेबत बैठक घेण्याचे ठरले. त्यामुळे या बैठकीनंतर आता हस्तांतरणाचा विषय मार्गी लागू शकताे.