शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

नरेंद्र मोदी, शहा वगळता भाजपात सर्वच अन्यायग्रस्त; राजू शेट्टी यांचा भाजपला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 5:39 PM

भाजपात सध्या सुरू असलेल्या ‘ओबीसी’ वादावर त्यांनी उपरोक्त भाष्य केले.

उस्मानाबाद : भारतीय जनता पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित हे दोन नेते वगळता सर्वच अन्यायग्रस्त आहेत, अशी टिप्पणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. भाजपात सध्या सुरू असलेल्या ‘ओबीसी’ वादावर त्यांनी उपरोक्त भाष्य केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बांधणीसाठी माजी खासदार शेट्टी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी उस्मानाबादेत आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. प्रत्येक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत असतानाच माजी खासदार शेट्टी यांनीही मोठे विधान केले. दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि अवकाळी पावसामुळे आमचा शेतकरी किड्या-मुंग्या प्रमाणे मरत आहे. त्यामुळे आमच्या या प्रश्नांपुढे राज्यातील अन्य प्रश्न गौण आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाना साधला.

महाविकास आघाडीच्या ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’मध्ये शेतकरी कर्जमुक्त करणे व थकित वीजबिल माफ करणे या दोन बाबींना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सरकारने सदरील दोन्ही निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. सोबतच १ रूपया १६ पैसे प्रति युनिट या प्रमाणे कृषी पंपास वीजपुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमोल हिप्परगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :BJPभाजपाRaju Shettyराजू शेट्टीAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी